हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे.

अमरावती येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा !

येथे शहरात ३ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी क्षमा मागितली पाहिजे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जगभरातील ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी त्या त्या देशांत जाऊन क्षमा मागितली; मात्र गोव्यातील ‘इन्क्विझिशन’विषयी गोमंतकियांची क्षमा अद्याप मागितलेली नाही. पोप यांनी गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी गोव्यासह सर्वत्रच्या हिंदु नागरिकांनी केली पाहिजे.

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी प्रवचन !

याचा लाभ ३५ औषधे विक्रेते आणि ५ महिला यांनी घेतला. प्रवचन झाल्यावर अनेकांनी शंकानिरसन करून घेतले. अनेकांनी ‘हा विषय प्रत्येक मासात आम्हाला सांगा’, असे मत व्यक्त केले.

हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढावी ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘अक्षय्य तृतीया’ हा हिंदु सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते; मात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने अक्षय्य तृतीयेच्या नावाखाली जणू ‘रमझान’चेच विज्ञापन करत

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथील संत वेणास्वामी मठाची स्वच्छता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मठाची स्वच्छता केल्यावर मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कुपवाड येथील शिवमंदिर येथे स्वच्छता करून तेथे साकडे घालण्यात आले.

वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्रीरामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले.

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला ! – सौ. शोभा पाटील, नगरसेविका, भाजप

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मंदिरांमध्ये सत्त्विकता आणि सकारात्मकता असतेच; मात्र तेथील स्वच्छता झाल्यामुळे त्या ठिकाणची प्रसन्नता अधिक वाढते.