सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न !

सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै २०२४ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम् आदी भाषांमध्ये देशभरात ७५ ठिकाणी होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा.

वाराणसीमध्ये (उत्तरप्रदेश) विविध ठिकाणी ‘तणावमुक्ती नियंत्रण’ विषयावरील प्रवचनांना शिक्षकांचा चांगला प्रतिसाद

तणावासारख्या सार्वत्रिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे.

चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्राप्रमाणे योग्य साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्था

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जीवनामध्ये आनंद प्राप्त करता येतो.

बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.

तणावमुक्तीसाठी अध्यात्माला पर्याय नाही ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘हेमा’ हायर सेकंडरी स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ वर प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत येथील हायर सेकंडरी स्कूल’ या शाळेत ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवन’ या विषयावर..

आनंदमय जीवनासाठी दोषनिर्मूलन आणि गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोषनिर्मूलनासह गुणसंवर्धन करण्याचा प्रयत्न केल्यास आपण निश्चितपणे आनंदमय जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी केले.

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.

ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.