धर्मसाम्राज्याचे संस्थापक जगद्गुरु आद्यशंकराचार्य
ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्यात शंकराचार्यांनी मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली.