अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या ‘मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन’ मध्ये सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव सहभागी !

मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते.

भाद्रपद पौर्णिमा (७.९.२०२५) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण !

खग्रास चंद्रग्रहण, म्हणजे जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात अन् पृथ्वीची सावली चंद्रावर पूर्णपणे पडते. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकोळलेला दिसतो. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते.

पुणे येथील सनातनचे साधक श्री. रवींद्र गोंधळेकर (वय ८० वर्षे) आणि श्रीमती वर्षा भिडे (वय ७३ वर्षे) संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. रवींद्र गोंधळेकर (वय ८० वर्षे) तर साधिका श्रीमती वर्षा भिडे (वय ७३ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याची घोषणा पुणे येथे पार पडलेल्या एका आनंददायी सोहळ्यात करण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ डॉ. नीलेश लोणकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी.

गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावल्यावरून सनातनच्या साधकाचा पोलिसांकडून बेकायदेशीर डांबून छळ; दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवडी परिसरात ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’ अशा आशयाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावणाऱ्या श्री. संदीप हरिश्चंद्र शिंगाडे या सनातनच्या साधकाला किडवाई मार्ग पोलिसांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय ताब्यात घेऊन दीड तास त्यांचा छळ केला.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सनातन संस्थेच्या वतीने राजस्थान येथे विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोजत येथील नृसिंहपुरामधील राधा कृष्ण मंदिर, अजमेर येथे पुष्कर रोडवरील खाटू श्याम मंदिर आणि जयपूर येथे चौरा रस्ता भागातील राधा दामोदर मंदिर येथे ग्रंथप्रदर्शन, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा धुळे येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात सहभाग

मंदिरांमधून धर्मशिक्षण दिल्यास राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गरिबीमुळे नव्हे, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू धर्मांतर करतात ! – सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. या भगवंताच्या वचनाला अनुसरून आपण साधना करून भगवंताचे भक्त बनलो, तर भगवंत आपली काळजी घेणारच आहे.

‘मनुष्याचा जन्म साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे’, या विषयावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी विविध धर्मग्रंथांतील श्लोकांचा दिलेला संदर्भ आणि त्यानुसार त्यांचे केलेले विवेचन !

‘मानवाचा जन्म दुर्लभ आहे. ‘मनुष्यजन्मात येऊन ईश्वरप्राप्तीच करायची आहे’, हे भगवंत विविध स्वरूपातून सांगत असतो. मनुष्य देह हे एक यंत्र आहे. ‘मी जिवंत आहे’, ही जाणीव सतत ठेवून जीवन जगायचे असते.

गणेशोत्सवाच्या काळात राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार यांच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करा !

गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे.

मालेगाव, ७/११ व दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा ! – सनातन संस्थेचे आवाहन

मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. या प्रकरणांमध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्‍या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत,..