श्रीलंकेतील पंच ईश्‍वर मंदिरांमधील केतीश्‍वरम् मंदिर !

श्रीलंकेतील पंचशिव क्षेत्रांमध्ये ‘केतीश्‍वरम्’ हे पुष्कळ प्रसिद्ध आहे. ते उत्तर श्रीलंकेतील मन्नार जिल्ह्यातील मन्नार शहरापासून १० कि.मी. अंतरावर आहे.

रावणवधानंतर ‘ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे’, यासाठी प्रभु श्रीरामाने पूजलेले श्रीलंकेतील नगुलेश्‍वरम् मंदिरातील शिवलिंग !

रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.

‘दक्षिण कैलास’ म्हटले जाणारे श्रीलंकेतील तिरुकोनेश्‍वरम् मंदिर !

‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.

मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा !

धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात.

सेतुबंध रामेश्वर माहात्म्य !

भारताच्या दक्षिण-पूर्व किना-यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.

महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर

नाशिक हे जसे त्र्यंबकेश्‍वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्‍वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्‍वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.

कोकणची काशी : श्री देव कुणकेश्‍वर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. कुणकेश्वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते.

धायरी, पुणे येथील स्वयंभू देवस्थान श्री धारेश्वर !

धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. गाभा-यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. चैत्र वद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची मोठी यात्रा भरते.

ज्योतिर्लिंगांची स्थाने आणि महत्त्व

ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांतून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालू असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते.