धर्मानुसार आचरण केल्याने आरोग्याचेही रक्षण होत असल्याने चंद्रग्रहणाच्या वेळी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार विनाअन्न उपवास करा !

८.११.२०२२ या दिवशी चंद्रग्रहण आहे. वेधकाळात अन्नग्रहण करणे निषिद्ध आहे. ऋषिमुनींनी ग्रहणासंबंधी एवढे कडक नियम का बरे घालून ठेवले आहेत ?, असे प्रश्न पडू शकतात. पुढे दिलेले उपवासाचे लाभ समजून घेऊन एकदा स्वतः उपवास करून ते अनुभवल्यावर मात्र आपल्याला ऋषिमुनींप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल. २४ घंटे उपवास केल्याने पुढील लाभ होतात.

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) !

कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) यांच्याकडून सनातन संस्थेने श्री सिद्धिविनायकाची मूर्तीे घडवून घेतली. सनातन संस्थेचे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार त्यांच्याकडे शिल्पकला शिकण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना गुरुजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून वर्ष २०२१ च्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सनातनने घरोघरी लागवड मोहीम चालू केली. या अंतर्गत साधकांना घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. २०२२ च्या कार्तिकी एकादशीला या मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाला. या निमित्त पुण्यातील साधकांनी वर्षभरात केलेले प्रयत्न पाहू.

कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान; सनातनच्या आश्रमात झाला भावसोहळा !

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असणारे, तसेच कर्नाटक सरकारचा ‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त करणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन

सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य आणि सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आले.

२८ व्या निवासी कीर्तन शिबिरात सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर म्हणाले, ‘‘आधुनिक विज्ञानातील संशोधनापेक्षा भारतियांनी केलेले संशोधन हे अतीप्रगत आणि परिपूर्ण आहे. पाश्चात्त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सहस्रो वर्षे आधी ऋषिमुनी आणि महर्षी यांनी अतीप्रगत आणि परिपूर्ण संशोधन केलेले आहे.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

भारतभरातील सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे. सात्त्विक सुगंध असलेल्या आणि सर्व ऋतुंमध्ये वापरता येईल, अशा प्रकारचे कोणत्याही आस्थापनाचे साबण चालतील.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून ‘हे खरेच ईश्वरी कार्य आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुनःपुन्हा यायला आवडेल.’- श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा.

ऋषीमुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय बाळगले होते ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

श्री धन्वन्तरी देवता सर्व मानवांना आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. भारत देशाची ‘हिंदु संस्कृती’ श्रेष्ठ दर्जाची असून सारे जग आता आपले अनुकरण करत आहे. आपल्या ऋषी-मुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय त्यांच्या उराशी बाळगले होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले.