धर्मानुसार आचरण केल्याने आरोग्याचेही रक्षण होत असल्याने चंद्रग्रहणाच्या वेळी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार विनाअन्न उपवास करा !

८.११.२०२२ या दिवशी चंद्रग्रहण आहे. वेधकाळात अन्नग्रहण करणे निषिद्ध आहे. ऋषिमुनींनी ग्रहणासंबंधी एवढे कडक नियम का बरे घालून ठेवले आहेत ?, असे प्रश्न पडू शकतात. पुढे दिलेले उपवासाचे लाभ समजून घेऊन एकदा स्वतः उपवास करून ते अनुभवल्यावर मात्र आपल्याला ऋषिमुनींप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल. २४ घंटे उपवास केल्याने पुढील लाभ होतात.