सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष

हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.

सनातन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे ! – ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा, अध्यक्ष, जय माता दरबार, बरेली, उत्तरप्रदेश

सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे.

सहजभावात असल्याने समाजातील लोकांशीही जवळीक साधणारे पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा (वय ८१ वर्षे) !

पू. आजोबांसमवेत मी सांगली जिल्ह्यातील गोरक्षनाथांनी तप केलेल्या स्थानाचे दर्शन घ्यायला गेलो होतो. तेव्हा गोरक्षनाथांच्या चरणांवर वाहिलेला शेंदूर पू. आजोबांच्या अंगठ्यावर पडलेला दिसत होता. तो तेथे कसा आला ?, ते समजलेच नाही

धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतींना प्रायोगिक रूप देण्याचे सनातनचे कार्य कौतुकास्पद ! – आचार्य राघवकीर्ती

सध्या सर्वत्रच देवतांचे विडंबन चालू आहे. त्यात धर्मशास्त्र आणि धर्मजागृती करण्याचे सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.

हिंदूंना स्वातंत्र्यापासून आजतागायत धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे हिंदूंचे दुर्दैवच ! – प.पू. स्वामी परमानंद सरस्वती महाराज

हिंदूंना स्वातंत्र्यपासूनच धर्मशिक्षण द्यायला हवे होते; मात्र हे धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे दुर्दैवी. धर्मशिक्षण नसल्याने आज हिंदु समाज आपापसांत भांडून धर्म आणि राष्ट्र यांची हानी करत आहे, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे धार जिल्हा उपाध्यक्ष प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.

स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला मंगल भेट

नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी त्यांच्या काही अनुयायांसमवेत २८ एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली..

दुष्काळ : महाराष्ट्रासमोरील एक भीषण आव्हान !

गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. मध्यंतरी शासनाने १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली २ वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली. या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्या प्रकारे उठला आहे.

वसुंधरेचा कर्दनकाळ ठरू पहाणारा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारा मानव !

वसुंधरेची म्हणजे आपल्या पृथ्वीची मानवाने कशी अपरिमित हानी केली ?, याविषयीचा एक माहितीपट पहाण्यात आला. वसुंधरेने आधार दिला; म्हणून आपण जगत आहोत आणि आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी स्थूलदेह धारण करून साधना करणे शक्य होत आहे. पूर्वी मानव सुसंस्कृत आणि निसर्गाशी अनुकूल असे आचरण करणारा होता. त्याने तिला वसुंधरा म्हटले. तिच्यावर प्रेम केले आणि कृतज्ञतेच्या भावाने वास … Read more

आद्य शंकराचार्यांनी केलेल्या धर्मजागृतीच्या कार्याप्रमाणे सनातनच्या चळवळीला प्रतिसाद लाभो ! – महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी महाराज, श्री काशी अन्नपूर्णा अन्नक्षेत्र ट्रस्ट, वाराणसी

संतांच्या चरणस्पर्शाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन झाले चैतन्यमय ! उज्जैन, ३० एप्रिल (वार्ता.) – आद्य शंकराचार्यांच्या वेळेस धर्माला ग्लानी आली होती. धर्माच्या रक्षणार्थ तन, मन आणि धन अर्पण करणार्‍यांची आवश्यकता होती. त्या वेळेस त्यांनी घराघरात जागृती करून नागा साधूंची सेना सिद्ध केली होती. त्याप्रकारेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती … Read more

तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या पू. (कु.) रेखा काणकोणकर !

तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या अन् ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेपोटी रामनाथी आश्रमातील स्वयंपाक विभागाचे मोठे दायित्वही सहजतेने निभावत संतपद प्राप्त करणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर ! फेब्रुवारी २००८ पासून मला रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून पू. रेखाताईंचा या ना त्या निमित्ताने अनेकदा संपर्क आला. जून २०१५ पासून भगवंताच्या कृपेने ताईंच्या खोलीत त्यांच्या सहवासात … Read more