हिंदूंनो, सण साजरे करतांना त्यांचे महत्त्व लक्षात घ्या आणि संस्कृती भक्षकांना प्रतिरोध करा !
एकदा शिव काही कार्यास्तव पुष्कळ कालावधीसाठी बाहेर जातात. त्या वेळी एकट्या असलेल्या पार्वतीला लक्ष्मी तिच्या मळापासून पुत्र बनवण्यास सांगते. त्यामुळे तिचे एकटेपणही दूर होईल आणि जगताचा उद्धारही त्या पुत्रामुळे होईल, असे ती सांगते.