बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष संतपदी विराजमान !

स्वत:वर अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही त्याची पर्वा न करता इस्लामी देश असलेल्या बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे, त्यांचे आधारस्तंभ असलेले आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६७ वर्षे) त्यांच्या निष्काम कार्यामुळे संतपदावर विराजमान झाले आहेत…

राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान !

धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्त्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग २

आपल्या समोर एखादी मोठी व्यक्ती आली, उदा. संत आले, तर आपल्या मनावर एक प्रकारचे दडपण येते. येथे साक्षात् श्री दुर्गादेवी कु. अनुराधा यांच्या समोर आली, तर त्यांच्या मनावर केवढे दडपण आले असेल ! शेवटी ती जगदंबाच, आईच आहे.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग १

‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आतापर्यंत ९६ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे, तर १५ साधक सद्गुरु पदावर आरुढ झाले आहेत. त्यांपैकी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर १२ व्या संत आणि ६ व्या सद्गुरु आहेत. (वर्ष २०१९)

बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले.

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले आणि दैवी गुण असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी सनातनच्या ९६ व्या संतपदी विराजमान !

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. शिल्पा बर्गे यांनी केले.

पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

बालपण, वैवाहिक जीवन इत्यादी जीवनाच्या विविध टप्प्यांना परिस्थिती कशीही असली, तरी त्या आदर्श साधिकेप्रमाणे प्रेमभावाने आणि प्रसंगी साक्षीभावाने वागल्या आहेत.

ईश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि विविध दैवी गुणांनी युक्त असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) संतपदी विराजमान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात, शांत, समाधानी वृत्ती आणि देवाच्या कृपेसाठी तळमळणार्‍या श्रीमती कुसुम जलतारे (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

सतत वात्सल्यभावात राहून तळमळीने सेवा करणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२० मे २०१९) या दिवशी मार्गदर्शन करतांना सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

सतत आनंदावस्थेत असणारे आणि ‘ईश्‍वरी राज्य यावे’, ही तळमळ असलेले श्री. बन्सीधर तावडेआजोबा !

तावडेआजोबा सतत ईश्‍वरी राज्याच्या विचारांत मग्न असतात. त्यांना भेटायला कोणीही आले की, ते ईश्‍वरी राज्याविषयी उत्स्फूर्तपणे बोलतात. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे’, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. ‘ईश्‍वरी राज्य यावे’, यासाठी ते सतत प्रार्थना करतात.