मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. येथे व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे’’, असे मार्गदर्शन सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
