
नागपूर – हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित एक दिवसीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र्र अधिवेशना’त ते बोलत होते. यात १० हून अधिक संघटनांनी सहभाग घेतला.
अधिवेशनाला सनातनचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनीही संबोधित केले. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अधिवेशनासाठी पाठवलेला संदेश या वेळी वाचून दाखवण्यात आला.
ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रार्थना करा ! – पू. अशोक पात्रीकर
आपण वैयक्तिक जीवनात देवाकडे काहीतरी मागतच असतो. ज्यांना ‘ईश्वरी राज्य यावे’, असे वाटत असेल, त्यांनी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रतिदिन देवाला प्रार्थना करायला हवी.
मनोगत
१. श्री. वामनराव जोशी, वाचक, नागपूर : या कार्याशी जोडून रहायचे असेल, तर दिशादर्शन करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचले पाहिजे.
२. श्री. सुदर्शन सोनेवाने, गोंदिया : अधिवेशनामुळे देशभरात जाऊन कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
३. श्री. अभय खडबडे, युवा धर्मप्रेमी, गोंदिया : आमच्यासारख्या तरुणांना खर्या अर्थाने अध्यात्म आणि संत यांची ओळख झाली.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !
संत आणि धर्मवीर यांचा सन्मान
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी गाठली...
आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करायला हवे ! – अभय...
९ राज्यांतील ३६ जिल्ह्यांत आयोजित ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’ना २ सहस्रांहून अधिक स्थानिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !...