उष्णतेच्या तडाख्यात युरोप !

तापमानातील ही वाढ एकाएकी नाही. या विषयावर संशोधन करणार्‍या तज्ञांच्या गटाने ‘या तापमानवाढीला मानवी चुकाच कारणीभूत आहेत’, असा निष्कर्ष काढला आहे. घर, कारखाना, वाहतूक यांसाठी मोठ्या प्रमाणात तेल, गॅस, कोळसा यांचा वापर, प्रदूषण करणारे उद्योग, उष्णतेचे उत्सर्जन करणारे व्यवसाय यांमुळे तापमानात वाढ होत आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन !

सनातनच्या आश्रमात ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (खंड २)’ या सनातनच्या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते १३ जुलै २०२२ या दिवशी करण्यात आले.

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा !

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया’वरील ‘पोस्ट’ त्यांच्या वैयक्तिक समजाव्यात !

सनातन संस्था कोणत्याही राजकीय पक्षांसाठी कार्य करत नाही. सनातन संस्था कधीही राजकीय भूमिका मांडत नाही. संस्थेची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार केवळ सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांना आहे.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

हिंदु समाजावर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी केली नाही, तर हिंदूंचे पतन निश्चित आहे. त्यामुळे हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या मागे उभे राहून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘भगवा रक्षा वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आशिष तिवारी यांनी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

मध्यप्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

उज्जैन येथील गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेच्या सौ. स्मिता कुलकर्णी, इंदूर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, तर ग्वाल्हेर येथे समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’, या विषयावर मार्गदर्शन केले.

पुणे जिल्ह्यामध्ये मनमंदिरात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘सनातन संस्थे’च्या वतीने १३ जुलै या दिवशी पुणे येथील चिंचवड, कोथरूड, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, जुन्नर, शिरवळ, तळेगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

तणावमुक्तीसाठी स्वभावदोष दूर करण्यासह गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. वैदेही पेठकर, सनातन संस्था

तणाव दूर करण्यासाठी मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील दोषांवर परिणामकारक ठरणार्‍या गुणांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे आणि हे काम शिक्षकांच्या माध्यमातून होणे सहज शक्य आहे. त्यामुळे सनातन संस्था शिक्षक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैदेही पेठकर यांनी केले.

चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.

नगर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

सध्याचा काळ वाईट आहे, याची पावले ओळखून सर्वांनी अध्यात्माची कास धरून सतत साधना करणे आवश्यक आहे, तरच या आपत्काळात भगवंत आपले रक्षण करेल, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक, नगर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.