नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही प्रत्येकाला भेडसावणारी एक समस्या आहे. आत्मविश्वासाच्या अभावासह आपले व्यक्तीमत्त्व आणि चित्तावरील संस्कार त्याला ९० टक्के कारणीभूत असतात. तणाव घालवण्यासाठी अंतर्मनातील मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनेचा चांगला लाभ होतो.

कळंबोली (नवी मुंबई) येथे मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी बालक-पालक मेळावा !

मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकत्व ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. ती केवळ मुलांच्या मूलभूत, पालनपोषणाच्या गरजा पुरवण्यापुरती मर्यादित नसून मुलांना आधुनिक आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या जगात वावरतांना संस्कारक्षम बनवण्याचे मोठे दायित्व अंगीकारते.

पिंपरी-चिंचवड येथील ‘आय.डी.टी.आर्.’ संस्थेत वाहनचालकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त मन:स्थिती’ विषयावर मार्गदर्शन !

मनावर येणार्‍या ताणामागील शारीरिक आणि मानसिक कारणे समजून घेऊन त्यावर नामजप, प्राणायाम अन् स्वयंसूचना या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास मन चिंताविरहित अन् प्रसन्न रहाते.

पळस्पे (पनवेल) येथील ‘मोदी मोटर्स’ आस्थापनात सनातन संस्थेचे ‘तणावमुक्तीसाठी साधना’ विषयावर व्याख्यान !

मनुष्याच्या जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक असतात. आपल्या पूर्वआयुष्यातील संचित, प्रारब्ध आणि वर्तमानातील कर्म यांच्याशी त्या निगडित असतात. या समस्या सोडवण्यासाठी कुलदेवतेचे नामस्मरण, ध्यान करणे, आध्यात्मिक जीवन जगणे, म्हणजेच साधना करणे आवश्यक आहे.

जत येथे ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला आधुनिक वैद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

…कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ यांसारख्या योग्य साधनांचा अवलंब केल्यास आनंदप्राप्ती होऊ शकते. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे मिळणारे सुख हे तात्पुरते असते, खरा आनंद हा आध्यात्मिक आचरणानेच मिळतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी येथे केले.

सर्व वैद्यांसह सामान्य नागरिकांनी ‘जीवन संजीवनी तंत्र’ (CPR) शिकून घेणे काळाची आवश्यकता ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपत्कालीन प्रसंग सातत्याने येत असतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘प्रथमोपचार आणि जीवन संजीवनी तंत्र’ (सी.पी.आर्.) शिकून घ्यावे. संघटनेच्या सर्व वैद्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला यासाठी प्रशिक्षित करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली येथील अपंग मुलांसाठी रक्षाबंधन सण साजरा !

सांगली येथील वारणाली वसाहतीमधील ‘अपंग सेवा केंद्रा’तील मुलांसाठी सनातन संस्थेच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त ९ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मुलांना घडवण्यासाठी पालकत्व आदर्श असणे आवश्यक ! – सौ. सुलभा तांबडे, सनातन संस्था

मुलांवर आदर्श संस्कार घडवण्यासाठी पालकांचे वर्तन नेहमीच आदर्श असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन येथील पसायदान विद्यामंदिरामधील पालक मेळाव्यात सनातन संस्थेच्या सौ. सुलभा तांबडे यांनी केले. ‘पसायदान शिक्षण संस्थे’च्या पसायदान विद्यामंदिर आणि पसायदान माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत २५ जुलै या दिवशी श्रावण मासारंभ मुहूर्तावर ‘शिक्षक पालक सहविचार सभे’चे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्था आयोजित बालक-पालक मेळावा पार पडला !

येथील शाहूपुरी, खिंडवाडी आणि क्षेत्र माऊली या ठिकाणी सनातन संस्थेने बालक-पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला बालक आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्याचा लाभ ७७ बालक आणि २० पालक यांनी घेतला.

सनातन संस्था आयोजित बालसंस्कार वर्गामुळे मुलांमध्ये सकारात्मक परिवर्तन ! – पालकांचे मनोगत

सनातन संस्थेने जैसलमेर आणि सोजत येथे बालसंस्कार वर्गातील मुले अन् त्यांचे पालक यांच्यासाठी ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन केले…