
कोल्हापूर – आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही प्रत्येकाला भेडसावणारी एक समस्या आहे. आत्मविश्वासाच्या अभावासह आपले व्यक्तीमत्त्व आणि चित्तावरील संस्कार त्याला ९० टक्के कारणीभूत असतात. तणाव घालवण्यासाठी अंतर्मनातील मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनेचा चांगला लाभ होतो. स्वयंसूचना दिल्याने आपले विचार आणि भावना यांमध्ये चांगला पालट घडून येतो. चांगल्या सवयी मनावर बिंबवणे आणि नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
पन्हाळा तालुक्यातील बळपवाडी येथील ‘एकलव्य महिला पोलीस ॲकडमी’ येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आलेल्या युवतींसाठी आयोजित मार्गदर्शनात ‘ताण-तणावमुक्त जीवन’ या विषयावर त्या बोलत होत्या. याचा लाभ २०० हून अधिक युवतींनी घेतला. ‘पोलीस प्रशिक्षणामध्ये स्वत:ची निवड झाली नाही, तरी खचून न जाता त्यावर मात करत स्वत:चे ध्येयनिश्चित होईपर्यंत प्रयत्न करावेत’, असेही सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनीही युवतींना मार्गदर्शन केले.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले...