सर्व वैद्यांसह सामान्य नागरिकांनी ‘जीवन संजीवनी तंत्र’ (CPR) शिकून घेणे काळाची आवश्यकता ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

‘श्री धन्वन्तरि जयंती’ प्रसंगी उपस्थित वैद्य, तसेच मान्यवर

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २२ ऑक्टोबर (वार्ता.) – आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपत्कालीन प्रसंग सातत्याने येत असतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘प्रथमोपचार आणि जीवन संजीवनी तंत्र’ (सी.पी.आर्.) शिकून घ्यावे. संघटनेच्या सर्व वैद्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला यासाठी प्रशिक्षित करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले. ‘मलकापूर शाहूवाडी तालुका वैद्यकीय संघटने’च्या सलग २५ व्या वर्षी आयोजित ‘श्री धन्वन्तरि जयंती’ सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी खोट्या आरोपांखाली अटकेत असलेल्या निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या सुटकेविषयी आनंद व्यक्त करण्यात आला. आरतीपूर्वी ‘श्री धन्वंतरये नमः।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष वैद्य महेश सुतार, वैद्य भरत पाटील, वैद्य ज.बा. पाटील, वैद्या अस्मिता सुतार, वैद्य श्री. आणि सौ. मोहिनी अंबिके यांसह ३० वैद्यांनी याचा लाभ घेतला. ‘शैलेश नर्सरी’चे श्री. सुबोध भिंगार्डे, श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, श्री. ओजस भिंगार्डे यांची विशेष उपस्थिती होती.

Leave a Comment