डोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा !
आजचे पंढरपूर इसवी सन् १७१५ नंतरच्या पंरपरा जपणारे आहे. त्यापूर्वी पंढरपूर फार काळ सुलतानी अंमलाखाली होते. त्यामुळे प्रथा-परंपरा यांचा लोप झालेला होता; पंरतु ‘रथस्थ विठ्ठल दृष्टवा, पुनर्जन्म न विद्यते’ असा उल्लेख पांडुरंग महात्म्यात असल्यामुळे पूर्वीही रथोत्सव होता, हे समजते.
