पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते !

पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !

आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणा-या रिंगणाचे चित्रीकरण केले.

श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी !

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. ‘ही वारी कधी चालू झाली ?’, याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत; मात्र ‘ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.

डोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा !

आजचे पंढरपूर इसवी सन् १७१५ नंतरच्या पंरपरा जपणारे आहे. त्यापूर्वी पंढरपूर फार काळ सुलतानी अंमलाखाली होते. त्यामुळे प्रथा-परंपरा यांचा लोप झालेला होता; पंरतु ‘रथस्थ विठ्ठल दृष्टवा, पुनर्जन्म न विद्यते’ असा उल्लेख पांडुरंग महात्म्यात असल्यामुळे पूर्वीही रथोत्सव होता, हे समजते.