नाथपंथानुसार कठोर साधना करणारे आणि सनातनविषयी आदरभाव असलेले संभाजीनगर येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज !

संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.

प.पू. दास महाराज – दास्यभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण !

प.पू. दास महाराज यांनी साधकांना होणा-या वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी सनातनच्या विविध आश्रमांत मिळून एकूण ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ केले. त्यांनी केलेल्या पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाने सनातन संस्थेत यज्ञसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

सियाराम बाबा : एक अलौकिक संत !

त्यांनी १० वर्षांपर्यंत खडेश्वरी तपश्चर्या केली आहे. यात तपस्वी झोपण्यापासून सर्व कामे उभ्यानेच करत असतात. बाबा खडेश्वरी साधना करत असतांना नर्मदेला पूर आला होता; परंतु ते त्यांच्या जागेवरून बाजूला झाले नाहीत. तेव्हा पुराचे पाणी बाबांच्या केवळ नाभीपर्यंत पोचू शकले होते.

गुरुभक्तीचा आदर्श असलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे शिष्य प.पू. भास्करकाका !

वडाळा महादेव (जिल्हा नगर) येथील महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका कुशाग्र आणि बुद्धीवान होते. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांनी मद्रास (आयआयटी) येथेसुद्धा शिक्षण घेतले होते. त्यांनी महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची ३५ वर्षे निरंतर सेवा केली.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे विविध गुण

योगतज्ञ दादाजी म्हणजे विविध गुणांची खाणच !  त्यांच्यातील प्रत्येक गुणाची असंख्य उदाहरणे सांगता येतील; पण त्यांतील केवळ काही उदाहरणे पुढे देत आहोत.

मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

भगवंताने दिलेल्या आयुष्याला कुणी महत्त्वच देत नाही. भगवंताने दिलेल्या चैतन्यशक्तीची उपयोगिता जीवनाच्या उद्धारासाठी न करता ती अनावश्यक व्यय केली जात आहे. मिळालेले मानवी जीवन हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आहे. त्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. गुरूंच्या कृपाछत्राखाली साधना करून जीवन-मृत्यूच्या फे-यांतून यांतून सुटून भगवत्प्राप्ती करणे, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.’

आद्यशंकराचार्य यांनी केलेले कार्य

अराजकाच्या काळात वैदिक धर्माला केवळ शाब्दिक पंडिताची नव्हे, तर क्रियाशील पंडिताची आवश्यकता होती. ज्याचे आचरण शुद्ध असेल, ज्याची बुद्धी सखोल आणि वाणी पवित्र असेल, ज्याच्या अंतरात सामान्य जनांच्या उद्धाराचा कळवळा असेल, असा कुणीतरी लोकोत्तर पुरुष त्या कामासाठी अवतरायला हवा होता. ‘हा मार्ग आहे आणि हेच (योग्य) कर्म आहे’, असे आपल्या वाणीने आणि कृतीने उद्घोषित करील, असा तो पुरुषश्रेष्ठ असायला हवा होता. भगवत्पूज्यपाद आद्यशंकराचार्य तशा महापुरुषाच्या रूपाने अवतरले.

प.पू. भास्करकाका यांच्या गुरुनिष्ठेची काही उदाहरणे

वडाळा महादेव येथील महायोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे शिष्य आणि उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांनी १४ मेच्या पहाटे साडेसहा वाजता श्रीरामपूर येथील गुरुदेव काटेस्वामी आश्रमात देहत्याग केला. त्यांचे वय ६१ वर्षे होते. १५ मे या दिवशी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली आणि त्यावर आपल्या विचारांशी एकनिष्ठ असणार्‍या विद्वान, राष्ट्रप्रेमी अन् त्यागी महंतांची मठाधिपती म्हणून नेमणूक केली. त्यांनी सर्व भारतभरात एकूण १ सहस्र १०० मठांची स्थापना केली. ‘हे मठ आणि महंत, म्हणजे समर्थ संप्रदायाचा पाया आहे’, असे म्हटले जाते.