समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा

समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा. त्रैलोक्यात सद्गुरुच श्रेष्ठ आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादाविना कोणतेही कार्य होऊच शकणार नाही. श्रीरामाच्या आशीर्वादाविना सीतेचा शोध घेणे किंवा लंकेत जाणे शक्य नव्हते. शेवटी काय, ईश्‍वर हाच सद्गुरु अन् सद्गुरु हाच ईश्‍वर !

गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !

धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले.

श्री पंच अग्नि आखाडा

नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे श्री पंच अग्नि आखाड्याचे संत आचार्य महामंडलेश्‍वर ब्रह्मर्षी श्रीमद् रामकृष्णानंद महाराज आणि येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील दत्तवाडी गावातील खडेश्‍वर सेवा आश्रमाचे श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात उभय महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती … Read more

श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा

उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त.. नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महासचिव आणि काशी येथील श्री महंत सत्यगिरि महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी आखाड्यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत. संकलक : श्री. सचिन कौलकर १. आखाड्याची स्थापना, त्यांचे इष्टदैवत आणि नित्यसाधना त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) … Read more

श्री तपोनिधी निरंजनी आखाडा

श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची स्थापना संवत ९६० (वर्ष ९०४) मध्ये कच्छमधील मांडवी येथे झाली. कार्तिकस्वामी हे या आखाड्याचे इष्टदेव आहेत.

अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा !

श्री पंच दिगंबर अनी आखाडा हा भारतातील सर्व म्हणजे १३ आखाड्यांचा राजा मानला जातो. सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे यांचा समावेश असलेला हा आखाडा सर्वांत मोठा आखाडा आहेे.

उज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

२२ एप्रिल २०१६ या दिवशी उज्जैन येथे सिंहस्थपर्वातील पहिल्या अमृत स्नानाच्या (शाही स्नानाच्या) निमित्ताने, उज्जैन येथील धार्मिक आणि आध्यात्मिक स्थानांची माहिती पुढे दिली आहे.

कुंभमेळा

‘हिंदूऐक्य’ हा कुंभमेळ्याचा उद्घोष आहे. कुंभमेळ्यातून हिंदूंची धार्मिक अन् सांस्कृतिक अमरता प्रतीत होते.