
महामहमचा इतिहास
लोक आपली पापे धुण्यासाठी गंगा, यमुना, सरस्वती, शरयु, गोदावरी, महानदी, नर्मदा, कावेरी आणि पायोश्नी या नद्यांमध्ये स्नान करत. त्यामुळे या नद्यांचे पाप वाढले. त्या पापापासून मुक्त होण्यासाठी सर्व नद्या ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाने नद्यांची पापे धुण्यासाठी त्यांना एकत्रितरीत्या कुंभकोणमच्या तलावात स्नान करण्यास सांगितले. तेव्हापासून या महोत्सवाला आरंभ झाला.
काय आहे महामहम महोत्सव ?
महामहम महोत्सव प्रत्येकी १२ वर्षांनी येतो. मागचा महामहम महोत्सव २०१६ मध्ये साजरा करण्यात आला होता.
या महोत्सवाच्या वेळी देशातील सर्व महत्त्वाच्या नद्या कुंभकोणमच्या तलावात एकत्र येतात, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. त्यामुळे या काळात तलावात केलेल्या स्नानाचे फळ सर्व नद्यांमध्ये केलेल्या स्नानाच्या एकत्रित फळाइतके मिळते.
महामहम महोत्सवाचा शेवटचा दिवस सर्वांत विशेष समजला जातो; कारण या दिवशी कुंभकोणममधील सर्व मंदिरांच्या देवतांच्या मूर्तींना तलावात स्नान घालण्यात येते. या दिवशी लाखो हिंदू तलावात स्नान करतात. याला तीर्थावरी असे म्हणतात.
या दिवशी केलेल्या स्नानाने पापांचे हरण होते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. स्नानानंतर देवतांना अर्पणस्वरूपात धन अथवा भेटवस्तू दिल्या जातात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...