प्रयागराज : गंगा रक्षणाविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने ‘गंगारक्षण’ या विषयावर प्रदर्शन आयोजित !

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच ख-या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत, अशी खंत ‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली.

सनातनच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे ! – ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज, पंढरपूर

सनातन संस्थेने भारतीय संस्कृतीवर आधारित प्रदर्शन लावल्यामुळेे आपल्या परंपरांचे महत्त्व लोकांना कळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी येथे केले.

सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून साधना, राष्ट्र व धर्मरक्षण करण्यासाठी अनेकांना ज्ञान मिळत आहे – आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे प्रतिपादन सातारा येथील तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर मठाचे श्री.ष.ब्र.प्र.१०८ आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी येथे केले.

शरिरावर आलेले त्रासदायक (काळे) आवरण का आणि कसे काढावे ?

कालमाहात्म्यानुसार सध्याच्या सूक्ष्मातील आपत्काळात एकंदरीतच वाईट शक्तींचा त्रास वाढला असल्याने व्यक्तीवर त्रासदायक आवरण पुनःपुन्हा येत असते.

प्रयाग येथील कुंभमेळ्यामध्ये राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमामध्ये स्नान केल्यामुळे होणारे आध्यात्मिक लाभ !

‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या नद्या म्हणजे भारताच्या अनुक्रमे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या आहेत. या नद्यांमध्ये कार्यरत असणारी दैवी ऊर्जा संगमाच्या ठिकाणी एकवटली आहे.

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५५ व्या अधिवेशनात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन

या अधिवेशनामध्ये सनातनचे ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील वाचनालयांचे प्रतिनिधी येथे असणार्‍या विविध ग्रंथ प्रदर्शनांना भेटी देतात आणि त्याप्रमाणे वाचनालयासाठी लागणार्‍या ग्रंथांची खरेदीही करतात.

वर्धा जिल्ह्यात सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्थेच्या वतीने जानेवारी २०१९ मध्ये वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी सनातनच्या धर्मरथातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पुलगाव, हिंंगणघाट, सेलू, सिंदी, आर्वी आणि देवळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले.

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे ! – श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.

माघस्नान : महत्त्व, कालावधी आणि या काळात दान देण्यायोग्य वस्तू

माघस्नान म्हणजे माघ मासात पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या जलस्त्रोतांत केलेले स्नान. ब्रह्मा, विष्णु, महेश, आदित्य आणि अन्य सर्व देवता माघ मासात विविध तीर्थक्षेत्री येऊन तेथे स्नान करतात. त्यामुळे या काळात माघस्नान करण्यास सांगितले आहे.