सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर या आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक आणि स्तंभलेखक पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १७ मे या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी अधिवक्त्या रामतीर्थकर (श्रीमती) यांच्यासमवेत शुभराय महाराजांच्या वंशज श्रीमती शुभांगी बुवा याही उपस्थित होत्या.

सतत वात्सल्यभावात राहून तळमळीने सेवा करणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२० मे २०१९) या दिवशी मार्गदर्शन करतांना सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

गुजरातमधील ‘द्वारकाधीश’ मंदिर आणि द्वारकापीठ

श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या आधी समुद्रात द्वारका बुडवली. दुर्वास ॠषींच्या शापामुळे यदुकुळाचा नाश झाला. समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या भूभागाला नंतर द्वारकेचे स्थान प्राप्त झाले !

तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा करणारे अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्यास असलेले डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील बन्सीधर तावडे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान !

‘वैशाख पौर्णिमेला, म्हणजे १८ मे २०१९ या दिवशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी डिगस (तालुका कुडाळ) येथील श्री. बन्सीधर तावडे (वय ७९ वर्षे) हे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

सतत आनंदावस्थेत असणारे आणि ‘ईश्‍वरी राज्य यावे’, ही तळमळ असलेले श्री. बन्सीधर तावडेआजोबा !

तावडेआजोबा सतत ईश्‍वरी राज्याच्या विचारांत मग्न असतात. त्यांना भेटायला कोणीही आले की, ते ईश्‍वरी राज्याविषयी उत्स्फूर्तपणे बोलतात. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे’, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. ‘ईश्‍वरी राज्य यावे’, यासाठी ते सतत प्रार्थना करतात.

१०० व्या वर्षात पदार्पण करत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

योगतज्ञ दादाजींचे पितृवत छत्र लाभणे, ही ईश्‍वराने सनातनवर केलेली मोठी कृपा असून त्यामुळेच सनातन संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे.

साक्षात ईश्‍वराने सनातनला दिलेले अनमोल आणि दिव्य कृपाछत्र : योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्‍वराचे सुंदर नियोजन असून दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांमुळे त्यांनी अनेक साधकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. त्यांनी सिद्ध केलेले मंत्र, ते स्वतः करत असलेली अनुष्ठाने आणि इतर अनेक दिव्य उपचार यांमुळे साधकांभोवती दिव्य संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होत आहे.

ईश्‍वराशी एकरूप झालेले आणि निर्गुण स्थितीत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या काही अनमोल भावमुद्रा !

गेली अनेक वर्षे कठोर तपःसाधना केलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा देह अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांनी विभूषित आहे.

तुळजापूर (जि. धाराशिव) येथील पू. (श्रीमती) पुतळाबाई देशमुख (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘आमचे मूळ गाव देवळाली (जि. धाराशिव) होते. यजमान आणि ३ मुले यांसह आम्ही तुळजापूरला आलो. त्या वेळी आमच्याजवळ फार काही साहित्य नव्हते. घरची श्रीमंती होती; पण नातलगांनी आम्हाला काही आर्थिक साहाय्य केले नाही.

जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !

पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.