सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले अयोध्येतील रामललाचे दर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पाला प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील रामललाचे दर्शन घेतले.

जळगावचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार सुरेश भोळे यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट

जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी रामप्रसाद अडिग यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी श्री. रामप्रसाद अडिग यांनी १२ नोव्हेंबर २०१९ या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली

वाद्यांची निर्मिती का केली ?

ईश्वराने सृष्टीच्या पालन-पोषणाच्या दृष्टीने संगीताच्या माध्यमातून सर्व जिवांना आवश्यक अशी त्याची शक्ती देण्यासाठी निरनिराळ्या वस्तू आणि वाद्ये यांची निर्मिती केली.

फलटण (जिल्हा सातारा) येथील सनातन संस्थेच्या ३१ व्या संत पू. (श्रीमती) सरस्वती कापसेआजी (वय ९१ वर्षे) यांचा देहत्याग

‘फलटण (जिल्हा सातारा) येथील सनातन संस्थेच्या ३१ व्या संत पू. (श्रीमती) सरस्वती कापसेआजी (वय ९१ वर्षे) यांनी १३ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री राहत्या घरी देहत्याग केला.

श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी !

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. ‘ही वारी कधी चालू झाली ?’, याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत; मात्र ‘ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.

बेंगळुरू येथील वैज्ञानिक प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु आणि त्यांची पत्नी प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

बेंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थानात वैज्ञानिक म्हणून ४० वर्षे कार्यरत राहिलेले प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु यांनी सपत्नीक येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

भावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना शिबिरांचे आयोजन

तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला.

हिंदूंनो, प्रभू श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया !

श्रीरामजन्मभूमी प्रकरणी भगवान प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच सर्वोच्च न्यायालयाकडून आज समस्त हिंदु समाजाला ऐतिहासिक निर्णय मिळाला आहे, अशी आमची श्रद्धा आहे. याबद्दल प्रभु श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया.