धर्मांध घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदू ‘मानव’ म्हणून शेष रहाणार नाहीत ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्मांध घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. असे असतांनाही वर्ष २०१२ मध्ये ४० सहस्र असणारी रोहिंग्यांची संख्या आता कोट्यवधींच्या घरात आहे.

‘सनातन’च्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था विनामूल्य अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून अशा प्रकारचे व्यावहारिक उपक्रम राबवत नाही. त्याप्रमाणे कळवा (जिल्हा ठाणे) येथे वा अन्य कुठेही शाळा अथवा अन्य कोणताही व्यावहारिक उपक्रम चालू केलेला नाही.

सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला आरंभ; सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेचा लाभ घेण्याचे संस्थेचे आवाहन !

सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, सात्त्विक धर्माचरण, नित्य आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवरील अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथातील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी

सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

सनातन करत असलेले कार्य उत्तम ! – श्रीकृष्णनंद गुरुजी, दत्तसेवाश्रम, दावणगेरे, कर्नाटक

मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.

व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून (मृत्यूकुंडलीवरून) तिला ‘मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकणे आणि तिच्या चांगल्या-वाईट कर्मांचा बोध होणे

‘जिवाचा जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. जन्मकुंडलीवरून जिवाला या जन्मात भोगावयाच्या प्रारब्धाची तीव्रता आणि प्रारब्धाचे स्वरूप यांचा बोध होतो. जिवाच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकते. याला ‘मृत्यूकुंडली’ म्हणता येईल.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सोनोग्राफी’ यंत्राची आवश्यकता !

‘सनातन संस्थेचा रामनाथी, गोवा येथे मुख्य आश्रम आहे. या आश्रमात राहून अनेक साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. आश्रमात या सर्वांसाठी विविध वैद्यकीय सेवा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. या अंतर्गत रुग्ण-साधकांसाठी ‘सोनोग्राफी’ ही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, ही आता काळाची गरज बनली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला नाथ संप्रदायाचे साहाय्य !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य जणू अवतारीच आहे. असे म्हणतात की, अवताराने कार्यासाठी जन्म घेतला की, त्याच्या त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचे देवतागणही जन्म घेतात. याचीच प्रचीती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यामध्ये साधकांना येत आहे. त्यांना विविध ईश्वरी स्त्रोतांकडून या कार्यात आपणहून साहाय्य लाभत आहे.

श्राद्धामुळे पितृऋण फिटण्यास साहाय्य होते ! – सौ. सुजाता भंडारी, सनातन संस्था

श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा विधी असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. भाद्रपद पौर्णिमा ते अमावास्या या कालावधीत महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. सर्व पितरांना सद्गती मिळण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करणे महत्त्वाचे आहे.

‘श्री गणेशाचे अध्यात्मशास्त्र आणि सामूहिक नामजप’ या विदर्भातील ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय विविध माहिती आणि सामूहिक नामजप’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून गणेशभक्त, जिज्ञासू आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.