समष्टी कार्याची तळमळ असलेले पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे आणि प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता येथे झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली.

#Ayurved # आयुर्वेद : कोणत्या रोगांवर कोणती आसने उपयुक्त ?

‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’

#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा ?

काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

वर्ष २०१२ पासून दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाल्यानंतर जीवनमुक्तीची प्रक्रिया चालू झालेली आहे. अधिवेशनात ५ संत झाले आणि आजपर्यंत ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जीवनमुक्त झाले आहेत. हीच या अधिवेशनाची फलनिष्पती आहे.

चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे

३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. माझ्या चारचाकीच्या पुढे एक ट्रक (मालगाडी) होता. त्या ट्रकमध्ये अगदी वरपर्यंत सामान भरले होते. मार्गावरील विजेच्या तारा त्या सामानात अडकल्या आणि तो ट्रक त्या तारांना तसाच ओढत पुढे चालला होता.

साधकाच्या घरी असलेल्या देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना मला त्यांच्या छायाचित्रामध्ये पालट जाणवला. परात्पर गुरुदेवांच्या उजव्या गालावर चंदन किंवा अष्टगंध लावल्याप्रमाणे पट्टा स्पष्ट दिसत होता आणि हे छायाचित्र पुष्कळ मनोहारी दिसले. ‘ते पुन:पुन्हा पहात रहावे’, असे मला वाटले.

चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !

जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.

साधकांनो, ‘व्यष्टी साधनेचा आढावा देणे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे’, हे जाणा आणि नियमितपणे आढावा देऊन साधनेची फलनिष्पत्ती वाढवा !

साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’

साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आणि लाभ !

आपली साधना ही गुरुकृपायोगानुसार असल्याने साधनेमध्ये गुरुरूपातील संतांच्या मार्गदर्शनाला किंवा त्यांनी दिलेल्या साधनेच्या दिशेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आहे. या संदर्भात काही सूत्रे पुढे दिली आहेत.