तणावमुक्त जीवनासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आत्मविश्वासाचा अभाव आणि मनावर उमटलेले संस्कार हे तणावाला ९० टक्के कारणीभूत ठरत आहेत. – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

‘लोणारी समाज संघा’च्या कार्यक्रमात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

हिंदु धर्म, संस्कृती, सण यांच्या सामाजिक माध्यमासाठी सिद्ध केलेल्या सनातन संस्थेच्या विविध पोस्ट ‘लोणारी समाज महिला व्हॉट्सॲप समूहा’त पाठवून सर्वांचे प्रबोधन केल्याविषयी साधिका श्रीमती दीपाली मुटेकर यांचा श्रीफळ, शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गोमराई मारुति मंदिर येथे १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित प्रवचनात सद्गुरु सत्यवान कदम ते बोलत होते.

राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

तुम्ही देशाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्तरावर पुढे घेऊन जात आहात. अत्यंत आवश्यक आणि कुणीही न करत असलेले हे कार्य तुम्ही करत आहात.

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नैतिकता, चांगले संस्कार मिळत असतात. यांमधूनच भविष्यात चांगली आणि सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.

नांदेड सिटी (पुणे) येथे जिज्ञासूंनी घेतला ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ प्रवचनाचा लाभ

सिंहगड रस्ता येथील नांदेड सिटीमधील श्री स्वामी समर्थ मठ आणि महाअवतार बाबा मठ येथे आयोजित प्रवचन या कार्यक्रमाचा लाभ १५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु धर्मियांची स्थिती केविलवाणी झाली आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये

कडाक्याच्या थंडीतही सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन पूर्ण होईपर्यंत एकही जिज्ञासू जागेवरून उठला नाही. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या देवतांची सात्विक चित्रे, नामपट्टी, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही प्रत्येकाला भेडसावणारी एक समस्या आहे. आत्मविश्वासाच्या अभावासह आपले व्यक्तीमत्त्व आणि चित्तावरील संस्कार त्याला ९० टक्के कारणीभूत असतात. तणाव घालवण्यासाठी अंतर्मनातील मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनेचा चांगला लाभ होतो.

कन्नूर (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी अध्यात्म आणि धर्माचरण यांचे महत्त्व यांविषयीचे प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या साधकांनी उपस्थितांना ‘दैनंदिन जीवनात आध्यात्मिक विज्ञानाचे महत्त्व, सनातन धर्म आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

१५.२.२०२६ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.