तणावमुक्त जीवनासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

शारदा सेमी इंग्लिश स्कूल, अंबाजोगाई रोड, लातूर येथे उपस्थित शिक्षक आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना सद्गुरू स्वाती खाड्ये

लातूर – आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ‘तणाव’ ही गंभीर समस्या झाली आहे. आत्मविश्वासाचा अभाव आणि मनावर उमटलेले संस्कार हे तणावाला ९० टक्के कारणीभूत ठरत आहेत. तणाव दूर करण्यासाठी स्वभावदोषांवर मात करायला हवी. त्यासाठी स्वयंसूचना हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील शारदा सदन अनुसूचित जाती-जमाती विद्यालय, श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या प्रशाला, शारदा सेमी इंग्लिश स्कूल आणि डब्लू.पी.एस्. गुरुकुल आश्रम शाळा येथे शिक्षक अन् कर्मचारी यांच्यासाठी ‘ताण-तणावमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ १०० हून अधिक शिक्षक आणि कर्मचारी यांनी घेतला.

श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या प्रशाला, दयाराम रोड लातूर येथे उपस्थित शिक्षक आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना सद्गुरू स्वाती खाड्ये
शारदा सदन अनुसूचित जाती जमाती आश्रम शाळा,साई रोड,लातूर येथे सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी मार्गदर्शन करताना.

या प्रसंगी सनातनचे हिरालाल तिवारी यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला आणि श्री. राजन बुणगे यांनी स्वयंसूचना कशा सिद्ध कराव्यात, याविषयी मार्गदर्शन केले.

Leave a Comment