(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात कोणता अडथळा आहे ?’

कर्नाटकातील वार्ताभारती या धर्मांध चालवत असलेल्या दैनिकातून सनातन संस्थेवर सरकार बंदी का घालत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित करून सनातनवर खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. या दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक अब्दुसालम पुथिगे असून वृत्तसंपादक बी.एम्. बशीर हे आहेत.

अनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी !

देवाच्या शासनात चार महत्त्वाची खाती स्त्रीदेवतांकडेच सदासाठी देण्यात आली आहेत आणि त्या आपापली खाती समर्थपणे आणि उत्तम रितीने सांभाळत आहेत. आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्याचे संरक्षण खाते कालिकादेवीकडे, अर्थ खाते श्री लक्ष्मीदेवीकडे, शिक्षण खाते सरस्वतीकडे, तर अन्न खाते अन्नपूर्णादेवीकडे आहे. या देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला आहे; म्हणून ती सारे घर आणि प्रपंच समर्थपणे सांभाळू शकते, तसेच स्वसामर्थ्यावर तोलून धरू शकते.

सप्तर्षि जीवनाडी

वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्‍वामित्र वसिष्ठांना प्रश्‍न विचारत असतात.

भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

सप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, महर्षींमधले महर्षी जे आहेत, त्यात भृगु म्हणजे मीच आहे.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

जांघा, काखा, मांड्या आणि नितंब (कुल्ले) या भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर चट्टे निर्माण होतात.

रामनाथी आश्रम परिसरात शुभसंकेत देणारे प्राणी आणि पक्षी यांचे साधकांना झालेले दर्शन अन् त्यामागील आध्यात्मिक विश्‍लेषण

एखाद्या तीर्थक्षेत्री ज्या देवतेचे तत्त्व अधिक असते, तेथे त्या देवतेशी संबंधित पशू-पक्षी अथवा वनस्पती आढळून येतात.

अंगण गायीच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढल्याने वायूमंडलावर होणारा परिणाम !

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

हस्तरेषा, जन्मकुंडली आणि नाडीभविष्य

हस्तरेषा आणि पादरेषा, तसेच जन्मकुंडली या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की, जन्मवेळ चुकीची असल्यास भविष्य चुकते; मात्र हाताच्या रेषा प्रत्यक्ष दिसतात. त्यामुळे त्यावरून सांगितलेले भविष्य चुकण्याची शक्यता कमी असते का ?

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

हिंदु धर्मातील यज्ञातील हवनातून निर्माण होणारा धूर आणि इतर कारणांमुळे निर्माण होणारा धूर

येथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यज्ञाचे लाभ समजावेत, यासाठी यज्ञाचा धूर आणि प्रदूषण करणारे हानीकारक धूर यांची तुलना केली आहे.