परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रात्री आकाश, डोंगर आणि झाडे यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगांत थोडासा पालट होणे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

रात्रीच्या वेळी आकाश, झाडे आणि डोंगर यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगात थोडा पालट झाल्याचे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आलेे. हे पालट का आणि कसे होतात ?, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेरात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.

प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर भस्म आपोआप प्रकट होते. या भस्मामुळे संपूर्ण शिवपिंडी झाकली जाते.

काळा आणि पांढरा या रंगांचे पोषाख परिधान केल्यावर त्यांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी ‘ईश्‍वरनिर्मित सृष्टी अनेकविध रंगांनी नटली आहे. भूमी मातकट रंगाने, तर वृक्षवल्ली हिरव्या रंगाने नटलेल्या आहेत. ‘आपल्या जीवनात रंग नसते, तर….’, अशी एक क्षण कल्पना करून पहा. असे झाले असते, तर जीवन निरस झाले असते. पांढरा हा सप्तरंगांना सामावून घेणारा रंग आहे. सध्या समाजात … Read more

पखवाजवादनाचा (मृदंगवादनाचा) वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘पखवाज वाजवतांना प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक, यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

सद्गुरु सत्यवान कदम यांनी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

‘उच्च पातळीच्या संतांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमवेत नामजपादी उपाय करण्यासाठी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयानेे एक चाचणी घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीतून रस्त्यावरील दिवा पुष्कळ तेजस्वी आणि भोवती मोठे वलय असलेला दिसणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रात्रीच्या वेळी आश्रमाच्या परिसराला लागूनच असलेल्या रस्त्यावरील एका दिव्याभोवती पुष्कळ मोठे वलय असल्याचे आणि त्याचा तेजस्वीपणा वाढल्याचे लक्षात आलेे. ‘हे पालट का आणि कसे होतात ?’, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेर्‍यात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेली संस्कारित दत्तमूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर त्या दत्तमूर्तीवर झालेला परिणाम

‘दत्तमूर्तीचा उपयोग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता.

मासिक धर्माच्या काळात होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासणे

मासिक धर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने एक चाचणी घेण्यात आली.

कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकेने केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर होणारा परिणाम

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी ! सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगांतील छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग येण्याच्या मधील परिवर्तनाचा काळ, म्हणजेच संधिकाळ आहे, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. संधिकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे संधिकाळाचा लाभ करून घेण्यासाठी अनेक जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांना … Read more

अध्यात्म या विषयावर साधना नसणार्‍या एका लेखकाने, एका भोंदू गुुरूने लिहिलेली पुस्तके आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचा साधक-वाचकांवरील परिणाम अभ्यासणे

भोंदू गुरु अध्यात्मावर पुस्तके लिहितात आणि विदेशातही अध्यात्मावर लिखाण होत असून ही पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्यामुळे अध्यात्मावर पुस्तक लिहिणारा कसा आहे आणि त्याच्या पुस्तकाचा वाचकावर कसा परिणाम होऊ शकतो ?, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.