सनातनच्या आश्रमांमध्ये वर्ष २००६ पासून आतापर्यंत अनिष्ट शक्तींनी विविध माध्यमांतून केलेली आणि त्या करत असलेली सूक्ष्मातील अनेक आक्रमणे

धर्मप्रसाराचे कार्य हे एक प्रकारे देवासुर युद्धच असते. सनातनचे साधक धर्म आणि अध्यात्म यांचे कार्य ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून करत असल्यामुळे त्यांना अनिष्ट शक्तींकडून विरोधही मोठ्या प्रमाणात होत असतो.

मिठाच्या पाण्याच्या उपायाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

साधकाची प्रभावळ मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर २.२० मीटर झाली, म्हणजे पुष्कळ वाढली. मिठाच्या पाण्याच्या उपायांचा साधकावर झालेला हा सकारात्मक परिणाम आहे.

बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग’ आणि ‘महागणपति होम’ या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या श्रीफळाची (नारळाची) आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्‍या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे.

चलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

नवीन नोटेतील घटक सात्त्विक नसल्याने त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यातून ‘२ सहस्र रुपये मूल्याची नवीन नोट सात्त्विक नाही. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही, एवढेच नव्हे, तर त्रास होईल’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

स्त्रियांच्या मासिक धर्माच्या संदर्भात स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, विश्रांती घेणे इत्यादी. सध्याच्या मुली आणि स्त्रिया यांनी आधुनिकतेच्या आहारी जाऊन मासिक धर्माच्या वेळी न्यूनतम पाळावयाचे आचारही सोडून दिलेले आढळतात.

अंगण गायीच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढल्याने वायूमंडलावर होणारा परिणाम !

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवीचे चित्र आणि रांगोळी यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम !

या चाचणीत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे श्री महालक्ष्मी यंत्र, सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि रांगोळी यांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे या चाचणीद्वारे जाणता आले.

संत मीराबाईंशी संबंधित विविध स्थानांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. राजस्थानातील मेडता येथे त्यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि त्या ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती मधील स्पंदनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली..

१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाचे यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास..

देवतेच्या विडंबनात्मक, कलात्मक आणि सात्त्विक चित्रांचा यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास !

प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके…