मिठाच्या पाण्याच्या उपायाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

अनुक्रमणिका

परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’
या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१. प्रस्तावना आणि उद्देश

‘आध्यात्मिक त्रास होत असल्यास ते दूर व्हावेत आणि पुढेही होऊ नयेत, यांसाठी करण्यात येणार्‍या उपायांना ‘आध्यात्मिक उपाय’ असे म्हणतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोपे; पण अत्यंत परिणामकारक आध्यात्मिक उपाय सांगितले आहेत. त्यांपैकी ‘मिठाच्या पाण्याच्या उपायाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकावर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी २४.१२.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधकाची मिठाच्या पाण्याचे उपाय करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या दोन्ही निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. चाचणीत सहभागी झालेला साधक

हा साधक गेल्या १० वर्षांहूनही अधिक काळापासून साधना करत असून त्याला तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) आहे.

टीप : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

३ आ. मिठाच्या पाण्याचे उपाय

हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांपैकी एक उपाय आहे. त्यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांविषयी विस्तृत माहिती सनातन संस्थेद्वारा प्रकाशित ‘वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय सांगणार्‍या ग्रंथमालिके’त दिली आहे.

मिठाच्या पाण्याचे उपाय करण्यासाठी एका मोठ्या बालदीमध्ये घोट्यापर्यंत पाय बुडतील एवढे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये साधारण दोन चमचे खडे मीठ (समुद्राच्या पाण्यापासून बनवलेले जाडसर मीठ) टाकतात. त्रास असलेली स्वतःवर उपाय करणारी व्यक्ती या मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून ठेवते. या चाचणीत वापरलेल्या मिठाच्या पाण्याचे तापमान ३७.५ अंश सेल्सिअस, म्हणजे सर्वसामान्य निरोगी व्यक्तीच्या शारीरिक तापमानाएवढे होते.

४. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख

या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ आ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.

४ इ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ‘४ आ ३’ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’
उपकरणाद्वारे २४.१२.२०१६ या दिवशी केलेली निरीक्षणे

table-1-330x320

टीप : स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनरच्या भुजा उघडल्या, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.

७. निरीक्षणांचे विवरण

७ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

७ अ १. मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर नकारात्मक ऊर्जा न आढळणे : मिठाच्या पाण्याचे उपाय करण्यापूर्वीच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे साधकामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आहे आणि तिची स्पंदने साधकापासून ९८ सें.मी. (०.९८ मीटर) दूरपर्यंत आढळली आहेत. मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतरच्या निरीक्षणात नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. याचे कारण मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यामुळे साधकातील त्रासदायक स्पंदने नष्ट झाली आणि त्याच्यात सकारात्मक स्पंदने निर्माण झाली.

७ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

७ आ १. साधकामध्ये मिठाच्या पाण्याचे उपाय करण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा नसणे; पण उपाय केल्यानंतर सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. मिठाच्या पाण्याचे उपाय करण्यापूर्वी साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही; पण त्याने मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतरच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १५० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे साधकामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली आहे. याचे कारण सूत्र क्र. ‘७ अ १’ मध्ये दिल्याप्रमाणेच आहे.

७ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

७ इ १. साधकाची मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतरची प्रभावळ त्याच्या मिठाच्या पाण्याचे उपाय करण्यापूर्वीच्या प्रभावळीपेक्षा पुष्कळ अधिक असणे : सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते, तर चाचणीतील साधकाची मिठाच्या पाण्याचे उपाय करण्यापूर्वीची प्रभावळ १.४१ मीटर, म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा थोडी अधिक आहे. याचे कारण तो मागील काही वर्षांपासून नियमितपणे साधना करत आहे. साधकाची प्रभावळ मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर २.२० मीटर झाली, म्हणजे पुष्कळ वाढली. मिठाच्या पाण्याच्या उपायांचा साधकावर झालेला हा सकारात्मक परिणाम आहे.

८. निष्कर्ष

‘व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन सकारात्मक स्पंदनांची वृद्धी होण्यासाठी मिठाच्या पाण्याचे उपाय करणे लाभदायक असते’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (२४.१२.२०१६)

ई-मेल : [email protected]

 

९. घटकाची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यासण्याचा हेतू

‘एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

ऋतूनुसार बहुतेक लोक गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करतात. पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने अनेक समस्या दूर होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो, तसेच तणावही न्यून होतो. या व्यतिरिक्त  मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने आणखी कोणते लाभ होतात, हे पुढे देत आहोत.