बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे
जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मनुष्य जिज्ञासूच्या टप्प्याला असतांना धर्म किंवा अध्यात्म यांचे ज्ञान प्रथम बुद्धीने जाणून घेऊन त्यानुसार कृती करत गेला की, त्याची बुद्धी सात्त्विक होऊन तो प्रथम साधक, नंतर शिष्य आणि शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत पोचू शकतो.
