सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्वार्थांनी आदर्श असणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

‘डॉ. नंदकिशोर यांच्या पित्याचे नाव श्री. राम आसरे आणि मातेचे नाव सौ. द्रौपदी होते. श्री. राम आसरे हे व्यावसायिक होते आणि त्यांना अध्यात्माची आवड होती. ते साधना करत होते. पहाटे ४ वाजल्यापासून ते श्रीरामाचा नामजप करत असत. ते संपूर्ण घराची शुद्धी करत असत. आईसुद्धा कुलदेवीचा पुष्कळ नामजप करत होत्या. अशा आध्यात्मिक घरात डॉ. नंदकिशोर यांचा जन्म झाला होता.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे आनंदी राहून त्याला सामोरे जाणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पिवळ्या रंगाच्या चिमणीने येऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर बसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

एक पिवळ्या रंगाची चिमणी सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आली होती. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर ही चिमणी बसली होती. ‘चिमणी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याकडे आकृष्ट झाल्याने हे चैतन्य ग्रहण करण्यासाठी ध्यानमंदिरात आली आहे’, असे जाणवले.

‘कोरोना महामारी’च्या काळामध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवण्यामागील कारणमीमांसा

औदुंबराची झाडे हवेमध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात प्राणवायू सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही औदुंबर हा पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचा वृक्ष आहे.

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘श्रीविष्णूची शक्ती’, म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या अवतार असल्याचे सांगितले आहे.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वादनकलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीची दिलेली एक अमूल्य संधी !

आजकाल पाश्चात्यांची वाद्ये भारतीय वाद्यांच्या तुलनेत प्रगत असल्याचे स्थुलातून दिसत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचा परिणाम चांगला होत नाही. याचा एका कार्यक्रमामध्ये पुढीलप्रमाणे प्रयोग करून घेतला होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत उत्तरेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

प्राचीन काळी ऋषिमुनी यज्ञयागादी विधी करत आणि महाबलाढ्य राक्षस त्यात विघ्ने आणत. ऋषिमुनींना जिवे मारत, तसेच गोमांसभक्षण करत. अशा प्रकारे प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो, तसाच तो कलियुगातही चालू आहे.

साधकांना साधनाप्रवासात कुठेही अनुभूती वा सिद्धी यांमध्ये अडकू न देता लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मला अचानक स्थुलातून जाणवले की, ‘माझ्या मूलाधारचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत ऊर्जाशक्तीचा एक प्रवाह पाठीच्या मणक्यामधून सरळ वरच्या रेषेत गेला आणि तो प्रवाह मानेतच अडकला आहे.’ यापूर्वी मी असे कधी अनुभवले नव्हते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला आलेली ही अनुभूती ‘कुंडलिनीशक्तीच्या जागृती’ची आहे. हठयोगी, ध्यानयोगी, शक्तीपातयोगी यांच्यासाठी ही उच्च स्तरावरील अनुभूती आहे; पण आपल्याला अशा कोणत्याही शक्तीच्या स्तरावरील अनुभूतींमध्ये अडकायचे नाही.