नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास
भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
