नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

काही संत आणि द्रष्टे यांनी पुढील १-२ वर्षांतच तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे मोठी हानी होऊ शकते, असे सांगितले आहे. तेच काही प्रमाणात तज्ञ आता सांगत आहेत. यातून जनतेने स्वतःचे रक्षण करण्यासाठी उपययोजना कराव्यात आणि सरकारनेही त्यांना मार्गदर्शन करावे !

नवी देहली – भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०२० मध्ये भारतात विस्थापित झालेल्यांची संख्या १ कोटी ४० लाख आहे, तर वर्ष २०५० पर्यंत ती साडेचार कोटी होऊ शकते. ‘पर्यावरणाविषयी उदासीनतेची किंमत : विस्थापन आणि स्थलांतराचा त्रास’ या अहवालात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘अ‍ॅक्शन एड’ आणि ‘क्लायमॅट अ‍ॅक्शन नेटवर्क साऊथ एशिया’ यांनी हा अभ्यास केला आहे.

Leave a Comment