पू. (सौ.) अश्‍विनी पवार या छायाचित्रात इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्‍याचदा अनुभवायला मिळते.

वैश्विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच

‘वर्ष २०२० च्या जुलै मासाच्या आरंभी आमच्या रहात्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर एका भागात रहाणार्‍या व्यक्तीचे ती ‘कोरोना पॉझिटीव्ह’ असल्याचे निदान झाले. त्यामुळे आम्ही रहात असलेली इमारत सील करण्यात आली. त्यामुळे मला माझ्या दोन लहान मुलींना (मोठीचे वय ४ वर्षे आणि धाकटीचे वय ३ वर्षे) घेऊन माझ्या सासरी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.

एखाद्या प्रसंगामुळे अनावश्यक विचार वाढल्यास काय करावे ?

‘काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे साधकांचे विचार अधिक वाढतात आणि बहुतेक वेळा ते अनावश्यक असतात. असे घडल्यास येथे दिल्याप्रमाणे विचार करावा किंवा प्रयत्न करावेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

भक्तीमार्गात साधक प्रथम पूजापाठ करतो. तेव्हा कुणी म्हणते, ‘‘स्थुलातील पूजा काय करतोस ? भगवंत तर सूक्ष्म आहे ना ? पूजेऐवजी मानसपूजा कर.’’ नंतर मानसपूजेत मनाने मूर्ती ताम्हनात घेतली, मूर्तीला स्नान घातले….

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते.

कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली. सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. सत्संगांत अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय !

सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !

‘सनातन संस्थेच्या ॲप’वरील ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरात सांगितल्याप्रमाणे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केवळ अर्धा घंटा करूनही पित्ताचा त्रास समूळ दूर होणे

एक दिवस मी भ्रमणभाषवर अन्य काही पहात असतांना मला ‘सनातन ॲप’वर ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरामध्ये पित्ताच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करावा’, असे वाचनात आले. तेव्हा मी लगेच न्यास करून तो नामजप करायला आरंभ केला.

व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना करावयाचे प्रयत्न !

‘काही शारीरिक आणि कौटुंबिक अडचणी, तसेच आजारपण यांमुळे ज्यांना समष्टी साधना करणे शक्य नसेल, त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणे घरच्या घरीच साधना आणि सेवा करावी. घरातील नित्य कर्मे करतांना होणा-या चुका लिहून ठेवाव्यात आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घ्यावे.

साधकांनो, अमूल्य असा मनुष्यदेह आहे, तोपर्यंतच साधना आणि गुरुसेवा करू शकत असल्याने प्राप्त परिस्थितीतच झोकून देऊन साधना करा !

देह सोडून जातांना इथे असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाव्या लागतात. समवेत काही नेता येत नाही. समवेत केवळ एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ती म्हणजे साधना ! आपली साधना ही आपली खरी संपत्ती आहे. ‘आपला देह हा अमूल्य आहे. देह आहे, तोपर्यंतच आपण गुरुसेवा आणि साधना करू शकतो.