साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

धरणक्षेत्रात रहाणार्‍यांनो, स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा !

पावसाळा चालू झाल्यावर धरणे फुटण्याच्या घटना देशभरात कुठे ना कुठे घडत असतात. विशेष म्हणजे या धरणांच्या सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र शासकीय विभाग आहेत; पण या विभागांनी धरणे फुटण्यापूर्वीच जनतेला सतर्क करून हानी रोखली, असे कधी घडत नाही.

आपत्काळात पेट्रोल, डिझेल आदी इंधनांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने सायकलचा पर्याय निवडा !

‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एक उत्तम साधन आहे. सायकल चालवल्याने व्यायाम होत असल्याने ती चालवणे, हे वैयक्तिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे. अन्य वाहनांमुळे वायू, तसेच ध्वनी प्रदूषण होते; पण सायकल चालवल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे सायकल पर्यावरणपूरक आहे.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची तातडीने आवश्यकता !

रामनाथी आणि देवद येथील सनातन आश्रमामध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. यातील काही रुग्ण साधकांसाठी वेळोवेळी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यामुळे आश्रमात एखाद्या रुग्ण साधकाला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ असणे अत्यावश्यक आहे.

साधकांनी नामजपादी उपायांना बसतांना पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे तोंड करून बसावे !

‘सनातनचे आश्रम, सेवाकेंद्रे किंवा साधकांची निवासस्थाने येथे साधक प्रतिदिन स्वतःवर नामजपादी उपाय होण्यासाठी बसतात. उपायांचा लाभ होण्यासाठी नामजपाला बसतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी योगासने, प्राणायम, आयुर्वेदाचे उपचार इत्यादी प्रयत्न समाजातून होत आहेत. त्याबरोबर रोगप्रतिकारकशक्तीला पूरक असलेले आत्मबळवाढण्यासाठी साधनाच करावी लागते.

कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !

भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते.

साधकांनो, जे घडते, ते भल्यासाठीच, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने कोरोना सारख्या भयावह संकटाचा सामना करा !

सध्या कोरोनासारख्या भयावह संकटाने सार्‍या विश्‍वात थैमान घातले आहे. लक्षावधी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक राष्ट्रांतील जीवनावश्यक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या विषाणूमुळे मानवाची सर्व स्तरांवर अपरिमित हानी झाली आहे.

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील नामजपादी उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्‍वराला अपेक्षित आहे. आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.