साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘बर्‍याच साधकांना तीव्र किंवा मध्यम आध्यात्मिक त्रास आहे. ‘व्यष्टी वा समष्टी साधनेत चुका झाल्यास काही साधकांच्या मनात ‘मला असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे ही चूक झाली’, असा विचार येत असल्याचे लक्षात आले आहे. खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. वाईट शक्ती आध्यात्मिक त्रासाचा अपलाभ घेऊन साधकांमध्ये मुळात असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे झालेल्या चुकांविषयी अंतर्मुखतेने चिंतन न करता आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधकांच्या साधनेची हानी होते.

साधकांनी कोणतीही चूक झाल्यावर त्यामागील मूळ स्वभावदोष अथवा अहं यांच्या पैलूंचे चिंतन करावे आणि त्यांच्या निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करावेत.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)

Leave a Comment