हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत म्हणाल्या, ‘‘धर्म हा भारताचा प्राण आहे; परंतु आज आपण सणांचे मूळ चैतन्य गमावून बसलो आहोत कि काय ? अशी भीती वाटते. होळीचे रूपांतर ‘रिंग डान्स’मध्ये, नवरात्रीचे ‘हॉटेलमधील गरबा’मध्ये आणि दिवाळीचे महत्त्व केवळ ‘नरकासुर’वध किंवा फटाक्यांपुरते मर्यादित राहिले आहे.

राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !

सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ अंतर्गत राजहंसगड गावात भव्य ‘श्रीराम नामदिंडी’ उत्साही, चैतन्यमय आणि भावपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली.

सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही.

जय शंकर प्रतिष्ठान’चे पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान !

कार्यक्रमात सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले. काही मुलांना त्यांच्या हस्ते हनुमानचालिसा पठण स्पर्धेची बक्षिसे देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

या वेळी त्यांनी गोष्टी सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.डी. कांबळे यांनी केले.

श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !

रामनाम संकीर्तनाचे स्वरूप : रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे, श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे, हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे

ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागतयात्रांत सनातन संस्थेच्या वतीने ‘रामराज्या’ची संकल्पना !

ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे झालेल्या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये रामसेतूची संकल्पना साकारत हातात प्रतिकात्मक शिळा घेऊन सनातन संस्थचे साधक सहभागी झाले होते.

देहली आणि ग्रेटर नोएडा (फरीदाबाद, हरियाणा) येथे आयोजित केलेल्या रा.स्व. संघाच्या ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

येथील चित्तरंजन पार्कमधील ‘सी ब्लॉक पार्क’, ‘गोपाल वाटिका, तरुण एन्क्लेव्ह’ येथे रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले माध्यम !

एका पालकांनी सांगितले, मुलांना बालसंस्कारवर्गात सहभागी होण्यासाठी वेगळी आठवण करून देण्याची आवश्यकता भासत नाही. ती स्वतःहून उत्साहाने वर्गात उपस्थित रहातात.’पालकांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून माझ्या लक्षात आले, ‘बालसंस्कारवर्ग मुलांवर संस्कार करणे, त्यांचे चारित्र्य घडवणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे’, यांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.’

महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !

प्रदर्शनाला खासदार, आमदार, नगरसेवक आणि अन्य मान्यवर यांच्या उत्स्फूर्त भेटी !