मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या ठिकाणच्या शहरी भागांमधील सोसायटी, तर ग्रामीण भागांमध्ये गावागावांत, तसेच वाड्यांमध्ये बैठका घेऊन महायज्ञाचा प्रसार करण्यात येत आहे. यज्ञाच्या प्रसारासाठी आतापर्यंत २४३ कुटुंब बैठका, तर २५ हून अधिक सामूहिक बैठका घेण्यात आल्या. याद्वारे सहस्रो जिज्ञासूंपर्यंत महायज्ञाचे महत्त्व पोचवण्यात आले आहे.
