पंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा !
प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते !
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी भरलेल्या आनंदयात्रेत सहभागी होऊन विठुरायला भेटूया. वारीसमवेत प्रत्येक जिवाच्या आयुष्याची वारीही भक्तीमय होऊ दे, ही प्रार्थना !
