चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

‘चहा हे पेय सर्वांचेच आवडते आहे. काहींना चहाविना करमत नाही. त्यांना जेवण नसले, तरी चालेल; परंतु चहा पाहिजे असतो. काहींना त्यांची ठरलेली वेळ झाली की, चहा लागतो. चहा नाही मिळाला, तर त्यांना अस्वस्थ होते आणि चहा मिळाल्यावरच त्यांचे काम परत चालू होते. त्यांना सुचू लागते. अती चहा पिण्याचे तोटेही अनुभवलेले असतात; परंतु तरीही चहा हवा असतो. चहा पिणे एखाद्या व्यसनाप्रमाणे होऊन सुटत नाही. एखाद्या गोष्टीच्या एवढे आहारी जाणे, ही असामान्य गोष्ट आहे. तसेच या पेयात अशी काही विशेष चव आहे, असेही नाही. एखादा चविष्ट असलेला पदार्थही आपण मर्यादेपर्यंतच खातो. आपण समाधानी असतो. याचे कारण हिंदु पाककला परिपूर्ण आहे. आपल्याकडील सात्त्विक पदार्थ हा चविष्ट असून तो थोडासा खाऊनही तृप्त करणारा आहे. परत त्याविषयी मनात इच्छा होत नाही. उलटपक्षी राजसिक आणि तामसिक पदार्थ हे इच्छा जागृत करणारे असून त्यांविषयीचे विचार मनात परत परत येतात. यातच काहीतरी गूढ आहे; परंतु ते वरकरणी आपल्या बुद्धीला समजत नाही.

tea-cup

चहाचे गंभीर दुष्परिणाम !

चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक होतो. चहामुळे शरिराची अधिक हानी होते; पण चहाचे व्यसन जडल्यामुळे सामान्य माणसाला चहा सोडता येत नाही.

१. कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ कोर्‍या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो. दिवसाला ७ ते ३० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.

२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा अन् उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑक्टोबर या मासांत सर्वांनी चहा जपून अन् प्रमाणात प्यायला हवा.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात चहा हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.

– वैद्य महेश ठाकूर, कार्यवाह, आयुर्वेद विद्यापीठ (ठाणे जिल्हा) (दैनिक लोकसत्ता, ऑक्टोबर २०००)

 

चहा आणि कॉफी यांत दहा प्रकारची विषं असतात.

  • ‘टॅनिन’ विष १८ टक्के असते. ते पोटात छिद्र, वायू उत्पन्न करते.
  • ‘थिन’ नावाचे विष ३ प्रतिशत असते. त्यामुळे वेडसरपणा येतो. हे विष फुप्फुस आणि मस्तिष्क यांत जडपणा निर्माण करते.
  • ‘कॅफिन’ विष २.७५ प्रतिशत असते. ते किडण्या दुर्बळ करते.
  • ‘वॉलाटाइल’ विषाचा आतड्यांवर हानीकारक परिणाम होतोे.
  • ‘कार्बोनिक आम्ल’ यापासून आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) वाढते.
  • ‘पॅमिन’मुळे पचनशक्ती दुर्बळ होते.
  • ‘अ‍ॅरोमोलीक’चा आतड्यांवर हानीकारक प्रभाव होतो.
  • ‘सायनोजन’ अनिद्रा, पक्षाघात यांसारखे भयंकर रोग उत्पन्न करते.
  • ‘ऑक्सेलिक आम्ल’ शरिरासाठी अत्यंत हानीकारक ठरते.
  • ‘स्टिनॉयल’ रक्तविकार आणि नपुंसकता उत्पन्न करते.

 

बलाढ्य वाईट शक्तींची योजना कशी असते, याचे चहा हे एक उत्तम उदाहरण

बलाढ्य वाईट शक्तींची योजना कशी असते, याचे चहा हे एक उत्तम उदाहरण आहे. हे पेय भारतीय नसून त्रासदायक शक्तीचा साठा घेऊन आलेल्या इंग्रजांनी चहा-संस्कृती आणून तिचे बीज इथे पेरले आणि त्याच वेळी त्याचा प्रसार आपल्या नकळत केला. हे पेय चांगले नसूनही इतर अप्रतिम पेयांच्या तुलनेत चहाची आवड त्रासदायक शक्तीच्या आधारे जनमानसात त्याची छाप पाडून निर्माण केली गेली. नंतर आपल्याला त्याचे व्यसन लावण्यात आले आणि ‘चहा संस्कृती’ची निर्मिती झाली.

काळानुसार धर्म-अधर्माच्या सूक्ष्म-युद्धाचा हा एक भाग आहे. वाईट शक्ती प्रत्येक कृतीतून सत्त्व न्यून करून स्वतःची, म्हणजे त्रासदायक शक्ती वाढवण्याच्या प्रयत्नांत असतात. ते हे कसे काय करतात, हे सर्वसामान्यांच्या लक्षात येण्यासारखे नाही. या प्रकारेही त्यांनी आपली हिंदु संस्कृती लोप पावण्यास आरंभ केला आहे.’

– अज्ञात शक्ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून)

 

चहाला पर्याय

धने-जिर्‍याचा कशाय : चहापेक्षा धने-जिर्‍याचा कशाय पिणे चांगले असते.

बडिशेप इत्यादींचा कशाय : प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायात पुढील औषधी घटक वापरून कशाय करण्याचा प्रघात आहे. बडिशेप, धने, जिरे, ओवा, बाळंतशेप, गोखरू, वावडिंग, सुंठ आणि ज्येष्ठमध या वस्तू सम प्रमाणात घेऊन थोड्या भाजून मग दळून घ्याव्यात. प्रतिदिन काढा करण्यासाठी कपभर पाण्यात पाऊण चमचा दळलेली भुकटी घालून उकळून घ्यावे आणि कशाय गाळून उष्ण असतांना घ्यावा. त्यात साखर, मीठ, दूध इत्यादी काही घालावे लागत नाही.

हा काढा पोटाला पुष्कळ चांगला असतो. यातील बडिशेप आणि धने पोट स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त आहेत, जिरे शरिरातील उष्णता न्यून करते, ओव्यामुळे पोटात वायू (गॅसेस्) होत नाही, वावडिंगामुळे जंत होत नाहीत, सुंठीमुळे कफ होत नाही आणि ज्येष्ठमधाने काढ्याला गोडी येते अन् घसा स्वच्छ रहातो.

तुळशीचा काढा : प्रत्येक ऋतूनुसार ठराविक औषधी वनस्पतींचा काढा घेणे आरोग्याला अतिशय उपयुक्त ठरते. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा आवश्यकतेनुसार साखर घालून घेऊ शकतो. या काढ्यात दूध घालू नये. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा घेतल्याने सर्दी, खोकला, ताप येणे इत्यादी विकार होत नाहीत. तुळस विषघ्न असल्याने शरिरातील विषारी द्रव्यांचा नाश होतो, तसेच पचन सुधारून भूक चांगली लागू लागते.

त्याचप्रमाणे पुढील प्रत्येक पदार्थापासून दूध न घालता बनवलेले वेगवेगळे काढे (कशाय) हे चहाचा उत्तम पर्याय आहेत. या काढ्यांमध्ये आवश्यकतेनुसार साखर किंवा गूळ घालावा. – १. गवती चहा, २. तुळस, ३. आले किंवा सुंठ, ४. धने-जिरे, ५. लिंबाची साल किंवा पाने, ६. लवंग आणि ७. दालचिनी.

– वैद्य मेघराज पराडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१४.१२.२०१६)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.