हिंदूंचा अलौकिक ग्रंथ ‘भगवद्गीते’चे महत्त्व !
गीतेचे महत्त्व प्राचीन काळापासून तो आजतागायत अबाधित आहे. भारतातल्याच नव्हे; तर सर्व देशांतल्या विचारवंतांना तिच्याविषयी आदर आणि आस्था वाटत आली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये गीतेची भाषांतरे झाली असून गीतेवर अनेक ग्रंथही लिहिले गेले आहेत.
