॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १ – अर्जुनविषाद

श्रीमद्भगवद्गीतेतील ‘अर्जुनविषादयोग’ अध्यायात अर्जुनाला आपल्या विरुद्ध लढायला उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये आपलेच नातेवाईक दिसले. आप्तांना मारावे लागणार, हे पाहून अर्जुनाला विषाद झाला. त्याविषयीची पुढील कारणे त्याने भगवान् श्रीकृष्णांना सांगितली.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग १)

सांख्यशास्त्राची जी तत्त्वे आहेत, ती सनातन धर्माची मूलभूत तत्त्वे आहेत. सनातन धर्म आणि इतर धर्म यांतील अंतर काय ? तेही या तत्त्वांनी स्पष्ट होते. ती तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग २)

बुद्धीयोग हा कर्मयोग आहे. कर्मे कशी करायची, याविषयीची बुद्धी श्रीकृष्णांनी पुढीलप्रमाणे सांगितली आहे.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ३ – कर्मयोग

कर्मफळांची आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे; कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने (चित्तशुद्धी होऊन पुढे) त्याला परमेश्‍वराची प्राप्ती होते.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग

आत्मज्ञानाची प्राप्ती आणि कर्मसंन्यास म्हणजे कर्माच्या फळांचा त्याग हा संन्यास यांचे उपाय सांगितलेले असल्याने अध्यायाचे नाव ज्ञानकर्मसंन्यासयोग असे आहे.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग

कर्मसंन्यासयोग हा कर्ममुक्तीचा मार्ग आहे. कर्मांमधील कर्तेपणा सोडल्याने आत्मशुद्धी होते. पुढे ज्ञानप्राप्ती होऊन मोक्षरूप परमशांती मिळते.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ६ – आत्मसयंमयोग (ध्यानयोग)

मनाला अंतर्मुख करून मनातील सर्व विचार थांबवावेत. चंचल मन जेथे जेथे भटकेल, तेथून त्याला वळवून अंतरात्म्यात लावावे. यामुळे रजोगुण निवृत्त झाल्यावर मन शांत होऊन ब्रह्मात असलेला आनंद मिळतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग

श्रीकृष्णाला सगळेच भक्त प्रिय असले, तरी ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय असतो; कारण तो ईश्वराचेच स्वरूप असतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग

निर्गुण, निष्काम, अव्यक्त ईश्वराचे, श्रीकृष्णाचे स्मरण ठेवणारे जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्त होतात.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग

मन सतत ईश्‍वरात लावल्याने आणि ईश्‍वराची अनन्यभक्ती केल्याने भक्त ईश्‍वराशी सतत जुडलेला रहातो आणि ईश्‍वरालाच प्राप्त होतो.