॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १२ – भक्तियोग
ध्यान, सराव, ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न, कर्मे ईश्वराला अर्पण करणे, यातील कुठल्याही साधनेने क्रमाक्रमाने चित्तशुद्धी होऊन ईश्वरप्राप्ती होते.
ध्यान, सराव, ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न, कर्मे ईश्वराला अर्पण करणे, यातील कुठल्याही साधनेने क्रमाक्रमाने चित्तशुद्धी होऊन ईश्वरप्राप्ती होते.
शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमधील जीवात्मा हा ईश्वरच (ईश्वराचा अंश) आहे.
श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.
उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. उत्तम पुरुषाची कास धरून आपली उन्नती करून घ्यायची आणि जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे, हे आपल्या हातात आहे.
काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.
सत् हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन् तप यांची स्थिती सत् असते; म्हणून परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांना सत् म्हणतात.
परमात्म्यालाच आपले सर्वस्व मानून, ईश्वराचेच चिंतन करत तन-मन-धनाने आपली स्वाभाविक आणि शास्त्रविहित कर्मे ईश्वरालाच अर्पण करीत करणे, हे आपल्या कर्मांनीच ईश्वराची पूजा करणे आहे.
प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही.
गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे. १. आरोप : … Read more
रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.