गोस्वामी तुलसीदास (जन्म : वर्ष १५११, देहत्याग : वर्ष १६२३) हे उत्तरप्रदेशातील महान संत होऊन गेले. त्यांना महर्षि वाल्मिकी ऋषि यांचा अवतार मानले जाते. ते रामचरितमानस, अयोध्याकांड, सुंदरकांड इत्यादी महान आध्यात्मिक ग्रंथांचे रचयिते आहेत. त्यांचा आध्यात्मिक अधिकार सिद्ध करणारा एक प्रसंग पाहूया.
उत्तरप्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर या गोस्वामी तुलसीदास यांच्या गावी त्यांच्या देहत्यागानंतर त्यांनी भक्तांना दृष्टांत देऊन कालिंदी (यमुना) नदीत मी मूर्ती रूपात आहे. मला घेऊन जाऊन मंदिरात ठेवून पूजा करा, असे सांगितले. त्यानुसार भक्तांनी मूर्ती शोधायला आरंभ केला. आठवडा उलटूनही मूर्ती सापडत नव्हती. त्या वेळी तुलसीदास यांनी भक्तांना पुन्हा दृष्टांत देऊन सांगितले की, ज्या ठिकाणी पाण्यात बुडबुडे येत असतील, त्या ठिकाणी मी आहे. त्यानंतर त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या प्रभू घाटावर नदीत ही मूर्ती सापडली. वर दाखवलेली त्यांच्या जन्मखोलीत ठेवलेली हीच ती स्वयंभू मूर्ती !







संत सखुबाई
कृष्णभक्त संत मीराबाई
अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे...
अत्यंत साधी रहाणी असलेले, प्रेमळ आणि निःस्पृह पंत महाराज बाळेकुंद्री !
संत वेणाबाई
थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य संप्रदाय