पुरुषांचे अलंकार

Article also available in :

पूर्वी पुरुषांनी अलंकार घालण्याची प्रथा होती. सध्या मात्र बहुतांश पुरुष अलंकार परिधान करत नाहीत. यामागील काही कारणे, तसेच पूर्वी पुरुष वापरत असलेल्या काही अलंकारांचे महत्त्व या लेखातजाणून घेऊया.

१. पुरुष हे वैराग्यरूपी शिवतत्त्वाचे दर्शक असल्याने आणि अलंकार
हे आकर्षणाचे प्रतीक असल्याने पुरुष सर्वसाधारणतः अलंकार घालत नसणे

संकलक : पूर्वीच्या काळी पुरुषांनी अलंकार घालण्याची पद्धत होती; मात्र सध्याच्या काळात बरेच पुरुष अलंकार घालत नाहीत. पुरुषांनी अलंकार घालणे हे योग्य आहे कि अयोग्य ?

एक ज्ञानी : पुरुष मायारूपी अफाट पसार्‍यात नटणार्‍या वैराग्यरूपी शिवतत्त्वाचे दर्शक असतात.वैराग्यस्वरूप शिवतत्त्व हे मायेच्या आलंबनातून कार्य करते; पण ते मायेच्या स्वरूपाला स्वतःत आकर्षित करून घेत नाही. अलंकार आकर्षणाचे प्रतीक असल्याने पुरुष सर्वसाधारणतः अलंकार घालत नाहीत.

– श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १७.६.२००७, सायं. ७.०९

२. पुरुषांच्या अलंकारांचे काही प्रकार आणि त्यांचे लाभ

२ अ. मुकुट

१. तेजाच्या स्तरावर सूर्यनाडीद्वारे सतत सजगता आणि कार्यरतता टिकवणे शक्य होणे

‘पूर्वीच्याकाळी राजांच्या डोक्यावर असणारा मुकुट हा डोक्याच्या परिघावरील बिंदूंवर गोलाकार पद्धतीने सारखाच दाब निर्माण करून त्यात सामावल्या गेलेल्या पोकळीद्वारे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून देहात तेजाचे संवर्धन करण्यास पूरक ठरत असे. त्यामुळे त्यांना तेजाच्या स्तरावर सूर्यनाडीद्वारे सतत सजगता आणि कार्यरतता टिकवणे शक्य होत असे.’

– सूक्ष्म जगतातील एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.१०.२००७, रात्री ८.३३)

२. सात्त्विक राजांनी सुवर्णमुकुट धारण केल्याने त्यांची बुद्धी सात्त्विक होऊन त्यांना देवतांकडूनज्ञान ग्रहण करता येणे आणि सर्व प्रसंगांत योग्य निर्णय देता येणे

‘सात्त्विक राजांनी मुकुट धारणकेल्यामुळे त्यातील सात्त्विकतेमुळे त्यांची बुद्धी सात्त्विक होत असे. ब्रह्मदेव आणि श्री सरस्वतीदेवीयांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानलहरी ते सहजपणे ग्रहण करू शकत होते. त्यामुळे त्यांची सखोल विचारकरण्याची वृत्ती होती आणि त्यांची निर्णयक्षमताही चांगली होती. ते प्रजेला योग्य निर्णय द्यायचे. प्रजेच्या सर्वअडचणींवर उत्कृष्ट उपाययोजना शोधून देत असत. ज्ञानामुळे त्यांची बुद्धी सात्त्विक होऊन त्यांचा विवेकसतत जागृत असे आणि देवतांकडून वेळोवेळी मिळणार्‍या मार्गदर्शनामुळे कठीण प्रसंगातही ते योग्य निर्णयअन् न्याय देत असत. त्यामुळे अशा राजांची सर्व राज्यव्यवस्था सुरळीतपणे चालू असे.

३. मुकुटातील रत्नांमध्ये उच्च देवतांच्या शक्ती, चैतन्य, आनंद अन् शांती या स्तरांवरील सूक्ष्मतरआणि सूक्ष्मतम लहरी हिर्‍यांच्या रंगांप्रमाणे आकृष्ट होत असणे

‘मुकुटाचा पृष्ठभाग सोन्याचा असतोआणि त्यावर विविध रत्ने अन् हिरे जडवलेले असतात. मुकुटातील सोन्यामध्ये उच्च देवतांच्या सूक्ष्मतमस्तरावरील तत्त्वलहरी आकृष्ट होतात. मुकुटातील रत्नांमध्ये उच्च देवतांच्या शक्ती, चैतन्य,आनंद आणि शांती या स्तरांवरील सूक्ष्मतर अन् सूक्ष्मतम लहरी हिर्‍यांच्या रंगांप्रमाणे आकृष्ट होतात, उदा.पाटल (गुलाबी) आणि तांबड्या (लाल) रंगांकडे शक्तीच्या, पिवळ्या रंगाकडे चैतन्याच्या, निळ्या रंगाकडेआनंदाच्या, तर पांढर्‍या रंगाकडे शांतीच्या लहरी आकृष्ट होतात.

४. मुकुटातील पोकळीमध्ये उच्च देवतांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असणे

मुकुटातील पोकळीमध्ये उच्चदेवतांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असते. मुकुट धारण केल्यावर राजांना उच्च देवतांच्या सगुण-निर्गुण अशा दोन्हीस्तरांवरील तत्त्वांचा लाभ होऊन ज्ञान, पराक्रम, ऐश्वर्य, यश, कीर्ती इत्यादी गुणांची प्राप्ती होऊन त्यांनाराजाची कर्तव्ये चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येत होती.

५. मुकुट घातल्यानंतर मुकुटाचा भार (वजन) डोक्यावर येऊन डोक्याच्या विविध बिंदूंवर दाब येऊन बिंदूदाबन आणि आध्यात्मिक उपाय होतात.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ११)

२ आ. कुंडले

‘पूर्वीच्या काळी ऋषिमुनी आणि राजे कानात कुंडले घालत असत. कुंडले घातल्याने कानांच्या पाळ्यांवर असलेल्या बिंदूवर दाब देऊन जिवाच्या देहात वैराग्यभावाचे संवर्धन होत असे.

 २ इ. भिकबाळी

कानात घालण्यात येणारी भिकबाळी ही पुरुषांच्या संयमीपणात वाढ करणारी, म्हणजेच क्रियेच्या स्तरावर संयम राखणारी आहे.

२ ई. रुद्राक्षाच्या बंधनमाळा

पूर्वीच्या काळी ऋषिमुनी दंड आणि मनगटे यांवर रुद्राक्षांच्या बंधनमाळाघालत असत. या माळा हातांच्या बिंदूंवर आवश्यक तेवढा दाब देऊन देहाला बलवर्धक असणारी आणि कार्याला स्फूर्ती देणारी शक्ती देहात संक्रमित करत असत अन् कार्यातील उतावीळपणाला वेसण घालत असत.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.१०.२००७, रात्री ८.३३)

 

३. आता मात्र पुरुष केवळ गळ्यात सोन्याची वा चांदीची साखळी, बोटांत एक किंवा अधिक
अंगठ्या आणि काही पुरुष दंडावर रुद्राक्षांच्या माळा हे अलंकार परिधान करतांना आढळतात.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’

Leave a Comment