भगवान शिव

भगवान शिवात उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज), सात्त्विक-तामसिक इत्यादी एकमेकांच्या विरुद्ध असलेली वैशिष्ट्ये आहेत.

एखाद्या देवतेसंबंधी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान कळले, तर त्या देवतेविषयी आपली श्रद्धा अधिक वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि ती अधिक फलदायी होते. या दृष्टीने या सदरात भस्म, रुद्राक्ष इत्यादी शिवाच्या वैशिष्ट्यांचा आध्यात्मिक अर्थ; रुद्र, नटराज आदी रूपे; ज्योतिर्लिंगे आदींचे तात्त्विक विवेचन; शृंगदर्शनाचा लाभ, खर्‍या अन् खोट्या रुद्राक्षांतील भेद, शिवपूजेसंबंधी विधीनिषेध; प्रदोष, महाशिवरात्री, शिवामूठ आदी व्रतांचे सूक्ष्म-चित्रे; तसेच शिवतत्त्वासंबंधी सात्त्विक रांगोळ्या येथे दिल्या आहेत. त्याचप्रमाणे शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? शिवाला हळद-कुंकू का वाहू नये ? यांसारख्या सूत्रांची कारणमीमांसा येथे दिली आहे.

सर्वसाधारणपणे बर्‍याच जणांना एखाद्या देवतेचा नामजप कसा करायचा, तिला कोणती फुले वहायची, यांविषयी माहिती असते; परंतु त्या देवतेचे कार्य, तिची अन्य अध्यात्मशास्त्रीय वैशिष्ट्ये आदींविषयी सखोल माहिती नसते. त्या दृष्टीने या लेखात ‘शिव’ या देवतेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.

भगवान शिवात उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज), सात्त्विक-तामसिक इत्यादी एकमेकांच्या विरुद्ध असलेली वैशिष्ट्ये आहेत.
भगवान शिवात उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज), सात्त्विक-तामसिक इत्यादी एकमेकांच्या विरुद्ध असलेली वैशिष्ट्ये आहेत.

शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ या षडक्षर मंत्राचा नामजप करा !

अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवती देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनने भगवान शिवाची नामजप पट्टी बनवली आहे. ही नामजप पट्टी बघत भक्त नामजप करू शकतात.

शिवाची उपासना कशी करावी ?

  • शिवपिंडीला अभिषेक करा
  • पांढ-या अक्षता, पांढरी फुले ‍वहा
  • बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.
  • शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा घाला

शिवपिंडीवर अभिषेक करा !

भगवान शिवाला शक्यतो दुधाचा अभिषेक करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो. दूध हे शक्तीचे प्रतीक असल्याने त्याचा अभिषेक शिवपिंडीवर केला जातो, हे त्यामागचे अध्यात्मशास्त्र आहे. असे केल्याने त्याचा पूजकाला आध्यात्मिक लाभ होतो.

शिवपिंडीला हळद-कुंकू ऐवजी भस्म लावा !

हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये. कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात. भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.

शिवाला बेल वहा !

शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर  शिव संतुष्ट होतो. बेलाची पाने तारक शिव-तत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

पांढर्‍या अक्षता वहा !

अक्षतांकडे (धुतलेले अखंड तांदूळ) निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्‍या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्‍या रंगाच्या अक्षता वहा.

शिवाला पांढरी फुले वहा !

शाळुंकेला निशिगंधा, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १० च्या पटीत त्यांचे देठ शिवपिंडीकडे करून वहावीत.

शिवाला कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ?

उदबत्ती आणि अत्तर यांतून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्‍या गंधांच्या उदबत्त्यांनी तीन वेळा ओवाळावे आणि केवड्याचे अत्तर वापरावे.

शिवतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळ्या

शिवतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणारी शक्तीची अनुभूती देणारी रांगोळी

११ ते ६ ठिपके दोन्ही बाजूंनी

शिवतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणारी शांतीची अनुभूती देणारी रांगोळी

मध्यबिंदूपासून अष्टदिशांना प्रत्येकी ४ बिंदू

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् ।
त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ।। – बिल्वाष्टक, श्लोक १

अर्थ : तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो.

अ. त्रिगुणातीत होण्यासाठी साहाय्यभूत ठरणे

‘सत्त्व, रज आणि तम यांमुळे उत्पत्ती, स्थिती अन् लय उत्पन्न होतात. कौमार्य, यौवन आणि जरा या अवस्थांचे प्रतीक म्हणून शंकराला बिल्वपत्र वहावे, म्हणजे या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जाण्याची इच्छा प्रगट करावी; कारण त्रिगुणातीत झाल्याने ईश्वर भेटतो.’

आ. बेल आणि दूर्वा यांच्याप्रमाणे गुणातीत अवस्थेतून गुणाला घेऊन कार्य केल्यास, ते कार्य करूनही अलिप्त रहाता येणे

‘शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर शिव संतुष्ट होतो. श्री गणेशसुद्धा त्रिदल दूर्वा स्वीकारतो. बेल आणि दूर्वा हे गुणातीत अवस्थेत राहून गुणाद्वारे भगवत्कार्य करतात; म्हणूनच ते भक्तांना म्हणतात, ‘तुम्हीसुद्धा गुणातीत होऊन भक्तीभावाने कार्य करा. गुणातीत अवस्थेतून गुणाला घेऊन कार्य केल्यास, ते कार्य करूनही अलिप्त रहाल.’ – प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

विवरण : सर्वसाधारण व्यक्तीला ईश्वराच्या निर्गुण, निराकार रूपाची उपासना करणे कठीण असते. बेल आणि दूर्वा यांसारख्या गुणातीत अवस्थेत राहून कार्य करणार्‍या पत्रींच्या साहाय्याने सगुण भक्ती करत, भक्ताला सगुणातून निर्गुणाकडे जाणे सुलभ होते.

अ. तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वहावा ?

बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

अ १. शिवाच्या तारक रूपाची उपासना करणारे

सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वहावे (बिल्वं तु न्युब्जं स्वाभिमुखाग्रं च ।).

अ २. शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे

शक्तिपंथीय शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात.

अ २ अ. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानाचे अग्र देवाकडे आणि देठ आपल्याकडे करून बेलपत्र वहावे.

अ २ आ. पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील ± अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके, अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा. कोवळे बिल्वपत्र आहत (नादभाषा) आणि अनाहत (प्रकाशभाषा) ध्वनी एक करू शकते. वाहतांना बिल्वपत्र पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवावा. तीन पानांतून एकत्र येणारी शक्ती आपल्याकडे यावी, हा त्यात उद्देश असतो. या तीन पवित्रकांच्या एकत्रित शक्तीने त्रिगुण न्यून (कमी) होण्यास साहाय्य होते.

आ. बेल वहाण्याच्या पद्धतीनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरावर होणारा शिवत्त्वाचा लाभ




बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्‍यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.

इ. बेल उपडा वहाण्यामागील कारण

बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

–परिक्षण

अ. ‘त्रिगुणात्मकतेचे प्रतीक असल्याचे जाणवणे : बिल्वपत्राकडे बघितल्यावर ते त्रिगुणात्मकतेचे प्रतीक असल्याचे जाणवले.

आ. शिवतत्त्वाची अनुभूती : बिल्वपत्रातून फार थंड लहरी येत होत्या. बिल्वपत्रामध्ये शांतीची स्पंदने जाणवत होती, तर त्याच्या बाहेरच्या भागातून शक्तीची ऊर्जात्मक स्पंदने जाणवत होती. या दोन्ही अनुभूतीबिल्वपत्रातील शिवतत्त्वामुळे आल्या.

इ. बिल्वपत्रामुळे ध्यान लागण्यास साहाय्य होणे : बिल्वपत्राच्या देठातून चैतन्याची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती आणि त्यामुळे ध्यान लागण्यास (मन एकाग्र होण्यास) साहाय्य होत असल्याचे जाणवले.

ई. नादाची अनुभूती येणे : माझ्या मनाला नादाची जाणीव होत होती.’

– कु. प्रियांका लोटलीकर 

अ. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे.

आ. बेलफळाला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही, असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा; मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये; कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते.

टीप १ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. प्रियांका लोटलीकर या सनातन संस्थेच्या साधिका आहेत. संस्था शास्त्रीय भाषेत धर्मशिक्षण देण्यासह प्रत्येक प्राणिमात्राच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव’

पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्‍हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्‍हणजे सोमाच्‍या दिशेकडे मंदिराच्‍या विस्‍ताराच्‍या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्‍हणजे नाला जातो, त्‍याला सोमसूत्र म्‍हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास, तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.

शृंगदर्शन (नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे)

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन खाली दिले आहे.

वामहस्ती वृषण धरोनि ।
तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि ।। – श्री गुरुचरित्र, अध्याय ४९, ओवी ४४

सविस्तर अर्थ : नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.

शृंगदर्शनाचा भावार्थ

नंदीच्या वृषणाला हात लावणे म्हणजे, कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. शिंग हे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांवर नियंत्रण ठेवायला शिकणे.

अ. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज पेलवता येणे

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्‍त‍ीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्‍या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्‍त‍ीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्‍त‍ीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरी पेलवणे व्यक्‍त‍ीला शक्य होते. नंदीच्या शिंगांतून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरिराला अचानक कंप सुटणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

आ. ‘शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍त‍ीचा झोत अधिक प्रमाणात कार्यरत होणे

उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. नळीमधून वारा सोडला असता त्याचा वेग आणि तीव्रता अधिक असते, तर याउलट पंख्याचा वारा सर्वत्र पसरतो. वरील मुद्रेमुळे नळीप्रमाणे कार्य होत असल्याचे जाणवते. या मुद्रेमुळे शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍त‍ीचा झोत अधिक प्रमाणात कार्य करतो.

इ. अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्‍त‍ीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था

शृंगदर्शनामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

इतर सूत्रे

अ. नंदी हे शिवाचे वाहन असल्याने नंदीच्या शृंगांमध्ये शिवाची अप्रकट क्रियाशक्‍त‍ी सामावलेली असते.

आ. शृंगदर्शन घेतांना व्यक्‍त‍ीच्या देहावरील काळ्या शक्‍त‍ीचे विघटन होते आणि मनातील अयोग्य विचार नष्ट होतात, तसेच तिची बुद्धीही शुद्ध होते.

इ. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सामान्य व्यक्‍त‍ीला सहन होणारी नसतात. शृंगदर्शनामुळे ती सहज ग्रहण होतात.

ई. शृंगदर्शनामुळे व्यक्‍त‍ीचा भाव जागृत होतो आणि ती शिवपिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेते, त्या वेळी तिच्यातील आत्मशक्‍त‍ी (काही क्षणांसाठी) जागृत होते, तसेच तिचे ध्यानही लागते.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था. (अधिक वैशाख शु. १२, कलियुग वर्ष ५११२, २५.४.२०१०)

शृंगदर्शनाच्या सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रासंबंधीचे लिखाण टंकलिखित करतांना त्यासंदर्भात ज्ञान मिळणे

अ. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी आवश्यक असणारी व्यक्‍त‍ीची आध्यात्मिक पातळी

श्री. राम होनप

किती टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाला शृंगदर्शन घेतल्याविना शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सहज ग्रहण होतात ?

उत्तर

व्यष्टी साधना करणार्‍यासाठी ५५ टक्के, तर समष्टी साधना करणार्‍यासाठी ४५ टक्के पातळीला शृंगदर्शन घेतल्याविना शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सहज ग्रहण होतात.

आ. सामान्य व्यक्‍त‍ीने शृंगदर्शनाविना दर्शन घेतल्यास तिच्यावर होणारे दुष्परिणाम

१. शारीरिक

अ. ‘शरिरातील उष्णता वाढणे

आ. उष्णतेमुळे होणारे विकार होणे (सामान्य व्यक्‍त‍ीने सातत्याने ६ मास अशा पद्धतीने दर्शन घेतल्यास हा त्रास होतो.)

२. मानसिक

अ. मनाची अस्वस्थता वाढणे

आ. दर्शन घेतल्यामुळे मनाला मिळणारे समाधान न मिळणे

३. आध्यात्मिक

अ. या स्तरावर होणारा लाभ अल्प प्रमाणात होणे

आ. सामान्य व्यक्‍त‍ीला शिवाची शक्‍त‍ी न पेलवल्यास त्या त्रासात टिकून रहाण्यासाठी त्या व्यक्‍त‍ीची साधना वापरली जाणे’

– श्री. राम होनप, सनातन संस्था, अधिक वैशाख शु. १२, कलियुग वर्ष ५११२, २५.४.२०१०, रात्री ८ वाजता

पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे रहाणे

शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला प्रत्यक्षात शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍त‍ीची आध्यात्मिक पातळी अधिक नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते़ त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो. या कारणासाठीच सर्वसाधारण व्यक्‍त‍ीने पिंडीचे दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी उभे रहावे.

(वरील तत्त्वानुसार श्रीविष्णु इत्यादी देवतांच्या देवळांत देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असणारी कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे राहून किंवा बसून देवतेचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेऊ इच्छिणार्‍याने कासवाच्या प्रतिकृतीच्या शेजारी उभे राहून दर्शन घ्यावे.)

५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या भक्‍त‍ात देवाकडून येणार्‍या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे त्या लहरींचा त्याला त्रास होत नाही. अशा भक्‍त‍ाने देवाचे दर्शन समोरूनच घ्यावे. यामुळे त्याला देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी सहजपणे ग्रहण करता येतात.

शिवपिंडीचे दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे राहून दर्शन घेतल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम


वामहस्ती वृषण धरोनि ।
तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि ।। – श्री गुरुचरित्र, अध्याय ४९, ओवी ४४

सविस्तर अर्थ : नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.

शृंगदर्शनाचा भावार्थ

नंदीच्या वृषणाला हात लावणे म्हणजे, कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. शिंग हे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे अहंकार, पौरुष आणि क्रोध यांवर नियंत्रण ठेवायला शिकणे.

अ. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज पेलवता येणे

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्‍त‍ीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्‍या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्‍त‍ीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्‍त‍ीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरी पेलवणे व्यक्‍त‍ीला शक्य होते. नंदीच्या शिंगांतून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरिराला अचानक कंप सुटणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

आ. ‘शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍त‍ीचा झोत अधिक प्रमाणात कार्यरत होणे

उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. नळीमधून वारा सोडला असता त्याचा वेग आणि तीव्रता अधिक असते, तर याउलट पंख्याचा वारा सर्वत्र पसरतो. वरील मुद्रेमुळे नळीप्रमाणे कार्य होत असल्याचे जाणवते. या मुद्रेमुळे शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍त‍ीचा झोत अधिक प्रमाणात कार्य करतो.

इ. अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्‍त‍ीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था

शृंगदर्शनामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

इतर सूत्रे

अ. नंदी हे शिवाचे वाहन असल्याने नंदीच्या शृंगांमध्ये शिवाची अप्रकट क्रियाशक्‍त‍ी सामावलेली असते.

आ. शृंगदर्शन घेतांना व्यक्‍त‍ीच्या देहावरील काळ्या शक्‍त‍ीचे विघटन होते आणि मनातील अयोग्य विचार नष्ट होतात, तसेच तिची बुद्धीही शुद्ध होते.

इ. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सामान्य व्यक्‍त‍ीला सहन होणारी नसतात. शृंगदर्शनामुळे ती सहज ग्रहण होतात.

ई. शृंगदर्शनामुळे व्यक्‍त‍ीचा भाव जागृत होतो आणि ती शिवपिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेते, त्या वेळी तिच्यातील आत्मशक्‍त‍ी (काही क्षणांसाठी) जागृत होते, तसेच तिचे ध्यानही लागते.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था. (अधिक वैशाख शु. १२, कलियुग वर्ष ५११२, २५.४.२०१०

शृंगदर्शनाच्या सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रासंबंधीचे लिखाण टंकलिखित करतांना त्यासंदर्भात ज्ञान मिळणे

अ. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी आवश्यक असणारी व्यक्‍त‍ीची आध्यात्मिक पातळी

श्री. राम होनप : किती टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाला शृंगदर्शन घेतल्याविना शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सहज ग्रहण होतात ?

उत्तर : व्यष्टी साधना करणार्‍यासाठी ५५ टक्के, तर समष्टी साधना करणार्‍यासाठी ४५ टक्के पातळीला शृंगदर्शन घेतल्याविना शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारी स्पंदने सहज ग्रहण होतात.

आ. सामान्य व्यक्‍त‍ीने शृंगदर्शनाविना दर्शन घेतल्यास तिच्यावर होणारे दुष्परिणाम

आ १. शारीरिक
आ १ अ. ‘शरिरातील उष्णता वाढणे
आ १ आ. उष्णतेमुळे होणारे विकार होणे (सामान्य व्यक्‍त‍ीने सातत्याने ६ मास अशा पद्धतीने दर्शन घेतल्यास हा त्रास होतो.)

२. मानसिक
आ २ अ. मनाची अस्वस्थता वाढणे
आ २ आ. दर्शन घेतल्यामुळे मनाला मिळणारे समाधान न मिळणे

३. आध्यात्मिक
३ अ. या स्तरावर होणारा लाभ अल्प प्रमाणात होणे
३ आ. सामान्य व्यक्‍त‍ीला शिवाची शक्‍त‍ी न पेलवल्यास त्या त्रासात टिकून रहाण्यासाठी त्या व्यक्‍त‍ीची साधना वापरली जाणे’

– श्री. राम होनप, सनातन संस्था, अधिक वैशाख शु. १२, कलियुग वर्ष ५११२, २५.४.२०१०, रात्री ८ वाजता

पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे रहाणे

शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला प्रत्यक्षात शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍त‍ीची आध्यात्मिक पातळी अधिक नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते़ त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो. या कारणासाठीच सर्वसाधारण व्यक्‍त‍ीने पिंडीचे दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी उभे रहावे.

(वरील तत्त्वानुसार श्रीविष्णु इत्यादी देवतांच्या देवळांत देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असणारी कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे राहून किंवा बसून देवतेचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेऊ इच्छिणार्‍याने कासवाच्या प्रतिकृतीच्या शेजारी उभे राहून दर्शन घ्यावे.)

५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या भक्‍त‍ात देवाकडून येणार्‍या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे त्या लहरींचा त्याला त्रास होत नाही. अशा भक्‍त‍ाने देवाचे दर्शन समोरूनच घ्यावे. यामुळे त्याला देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी सहजपणे ग्रहण करता येतात.



भगवान शिव संबंधित अन्य माहिती

भगवान शिवाशी
संबंधित अन्य व्रते

प्रदोष व्रत, हरितालिका, श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत), असे शिवतत्त्वाची लाभ करून देणारी व्रते आहेत. या व्रतांबद्दल जाणून घेऊया.

शिव आणि मूर्तीविज्ञान

या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.

शिवाचा परिवार, शिवलोक

शिवाच्या परिवारात पत्नी पार्वती, पुत्र कार्तिकेय आणि श्री गणपति, तसेच शिवगण, नंदी आदींचा समावेश आहे.

नटराज

शिवाचे ‘नटराज’ हे रूप सर्वांनाच, विशेषत: कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे….

भगवान शिवाची आरती

आरती लयबद्ध पद्धतीने म्हणण्याने आपल्यात जलद भावजागृती होण्यास साहाय्य होते. आरतीचा अर्थ समजून ती म्हटली, तर त्याचा अधिक लाभ होतो. ‘सनातन’च्या भाव असलेल्या म्हणजे ईश्‍वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

तर ऐकूया, सनातनच्या साधकांच्या आवाजातील शिवाची आरती ….

भगवान शिवाची मानसपूजा

साधनेच्या दृष्टीकोनातून स्थुलातील पूजा करणे हा पहिला टप्पा असून त्यानंतर मनाच्या स्तरावरील उपासनेस आरंभ होतो. या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन म्हणजे मानसपूजा ! मानसपूजेमध्ये आपल्या मनात उमटलेल्या देवतेच्या रूपाची पूजा आपल्याला करता येते. या पूजेचा एक लाभ म्हणजे स्थळ, उपकरणे, शुचिता इत्यादी कर्मकांडांतर्गत बंधने तिला नसल्याने कोणत्याही ठिकाणी ती करता येते. दुसरा लाभ म्हणजे मानसपूजेद्वारे अखिल ब्रह्मांडातील कोणतीही उत्तमातली उत्तम वस्तूही देवतेला अर्पण करता येते. याहूनही श्रेष्ठ असा तिसरा लाभ म्हणजे जेवढा वेळ मानसपूजा चालू असेल, तेवढा वेळ आपल्याला देवतेच्या अनुसंधानात रहाता येते. साधकाला साधनेमध्ये भावजागृती होण्यास या मानसपूजेचे पुष्कळ साहाय्य होते. तर ऐकूया आद्य शंकराचार्य यांनी केलेली शिवमानसपूजा !

शिवपिंडीचे प्रकार आणि वैशिष्ट्ये

१. भूमीच्या पातळीच्या खाली असलेली (स्वयंभू)अ. हिच्यात फार शक्ती असते; म्हणून ही भूमीच्या पातळीच्या खाली असते. वर असल्यास बाहेर पडणारी शक्ती भक्तांना सहन करता येणार नाही. (डोळ्यांतून बाहेर पडणार्‍या तेजामुळे दर्शनाला येणार्‍या लोकांना त्रास होऊ नये, म्हणून श्री तिरुपतीच्या बालाजीचे डोळे अर्धोन्मीलित आहेत.) पूजक भूमीवर आडवे पडून आत हात घालून हिची पूजा करतो. ज्योतिर्लिंगाच्या खालोखाल यांच्यात शिवतत्त्व असते. ही शिवेच्छेने निर्माण होतात. नंतर एखाद्या भक्ताला साक्षात्कार होऊन त्यांचा शोध लागून पूजा चालू होते.

आ. स्वयंभू शिवपिंड निर्माण होण्यामागील शास्त्र

१. ‘सृष्टीरचनेतील सूक्ष्म अडथळे दूर होऊन ही रचना सहजतेने कार्यरत रहावी.
आ २. ज्या ठिकाणी शिवशक्तीची आवश्यकता आहे.
३. ज्या ठिकाणी भक्ताला साधनेसाठी काळ प्रतिकूल आहे, तो ईश्वरी अस्तित्वाने अनुकूल व्हावा.ज्या ठिकाणी स्वयंभू शिवपिंडीची आवश्यकता आहे; परंतु ती प्रकट होत नाही, तेव्हा ते कालमाहात्म्य समजावे. तसेच असे होणे ही आपत्कालाचे सूचक समजले जाते. जेथे पूर्ण अंधार असतो, तेथे प्रकाशाचे महत्त्व लक्षात येते आणि तेव्हाच प्रकाशाचे कार्य चालू होते, तसेच भगवंताच्या कार्याविषयी म्हणता येईल.’

– (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून, अधिक वैशाख शु.१३, कलियुग वर्ष ५११२,२६.४.२०१०, दुपारी १२.३०)
२. भूमीच्या पातळीत असलेलेही ऋषी किंवा राजा यांनी प्रस्थापित केलेली असते. हिच्यात अल्प शक्ती असते. भक्तांना ती सहन करता येते. पूजक पिंडीच्या लगत (बाजूला) असलेल्या खोलगट भागात बसून पूजा करतो.
३. भूमीच्या पातळीच्या वर असलेली>ही भक्तांनी संघटितपणे प्रस्थापित केलेली असते. हिच्यात सर्वांत अल्प, सर्वांना सहन करता येईल एवढीच शक्ती असते. पिंडीच्या लगत बांधलेल्या ओट्यावर बसून पूजक हिची पूजा करतो.

२ आणि ३ या प्रकारच्या लिंगांना ‘मानुष लिंगे’ म्हणतात. ‘ही लिंगे माणसांनी घडविलेली असतात, म्हणून यांना मानुष लिंगे हे नाव मिळाले असावे. यांची स्थिर लिंगांत गणना होते. ब्रह्मभाग, विष्णुभाग आणि रुद्रभाग असे यांचे तीन भाग असतात. सर्वांत खालच्या भागाला ‘ब्रह्मभाग’ असे म्हणतात. हा भाग चौकोनी असतो. मधल्या अष्टकोनी भागाला ‘विष्णुभाग’ असे नाव आहे. हे दोन्ही भाग भूमीत पुरलेले असतात. सर्वांत वरच्या गोलाकार उभट भागाला रुद्रभाग हे नाव आहे. याला पूजाभागही म्हणतात, कारण पूजासाहित्य यावरच वाहिले जाते.

रुद्रभागावर काही रेषा असाव्या, असे मूर्तीशास्त्रावरील ग्रंथांत म्हटले आहे. या रेषांना ‘ब्रह्मसूत्रे’ म्हणतात. दैविक आणि आर्षक लिंगांवर अशा रेषा नसतात.’
४. अधांतरी असलेलीपार्‍याने बनविलेली सोमनाथाची पिंडी भूमीपासून पाच मीटर उंचीवर हवेत तरंगती होती. दर्शनार्थी तिच्या खालून जात. तीच पिंडीची प्रदक्षिणा होत असे.

भगवान शिव संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ग्रंथ खरेदी करा !
Sanatanshop.com