सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांचा खडतर जीवनप्रवास आणि त्यांना आलेल्या अलौकिक अनुभूती

बेळगाव जिल्ह्यातील रामनगर या गावामध्ये दिसणारी साधी भोळी माणसे, त्यांचे साधे राहणीमान आणि त्यांच्या डोळ्यातील निरागस भाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. याच गावात रहातात सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकरमामा !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

आपला उदासीन तोंडवळा दुसर्‍याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल.

स्वस्तिक हे चिन्ह ११ सहस्र वर्षे प्राचीन ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वस्तिक हे चिन्ह किमान ११ सहस्र वर्षे जुने आहे. हे चिन्ह आर्य संस्कृतीच्या आणि सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून अस्तित्वात होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्य !

१. स्वतः वेशभूषेत न अडकणे आणि साधकांनाही त्यात न अडकवणे अन्य संप्रदाय किंवा संत यांच्याकडे वेशभूषेच्या संदर्भात काही नियमावली असते. काही ठिकाणी भगवे वस्त्र धारण करणे आवश्यक असते, काही ठिकाणी धोतर अनिवार्य असते. प.पू. डॉक्टर मात्र कुठल्याही वेशभूषेत अडकले नाहीत आणि त्यांनी साधकांनाही अडकवले नाही. हिंदु संस्कृतीनुसार वेशभूषा करावी, अशी त्यांनी शिकवण दिली; मात्र त्याचा … Read more

विकार-निर्मूलन आणि साधनेतील अडथळे यांवर उपयुक्त : सर्वबाधानाशक यंत्र !

सातत्याने आजारी पडून किंवा दुखापत होऊन साधनेत अडथळे येणे, आध्यात्मिक त्रास होणे किंवा सेवा करतांना सेवेशी संबंधित उपकरण, वाहन इत्यादी बंद पडणे किंवा अन्य काही अडचणी येणे, यांवर हे यंत्र उपयुक्त आहे.

सर्वश्रेष्ठ राष्ट्र निर्माण करणारी वैदिक शिक्षणपद्धत !

पूर्वीच्या काळी वैदिक शिक्षणपद्धत होती. त्यामुळे भारत सर्वश्रेष्ठ असे राष्ट्र होते. ते इतके समृद्ध होते की, त्या वेळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जाते. या वैदिक शिक्षण पद्धतीचा पाया आध्यात्मिक होता. तसेच हे वैदिक शिक्षण कालातीत आणि हितकारी असल्यामुळेच त्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी राष्ट्राला उच्च स्थानावर नेऊन पोचवत होते.

गुरुकुल शिक्षणपद्धती

आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या, अध्यापन पद्धती काय असते, आदी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका गुरुकुल पद्धतीची माहिती येथे देत आहोत.

आनंददायी शिक्षणपद्धत कशी असावी ?

  वर्तमानात अभ्यास करून मुले खरेच आनंदी होत आहेत का ? शाळा चालू होऊन एक महिनाच होत आहे. तरीही शाळेच्या धकाधकीच्या वेळापत्रकामुळे मुले त्रस्त झालेली असतात. ‘कधी एकदा शाळा सुटते’, असे त्यांना सततच वाटत असते. परीक्षांच्या काळातही पाठ्यपुस्तकांतील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून ती अतिशय कंटाळून जातात. ‘परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला … Read more

मुलांसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक आहे का ?

मुलांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक ! पूर्वीच्या काळी गुरुकुलात मुलांना प्रथम अध्यात्मशिक्षण आणि नंतर ६४ कलांपैकी २ – ३ कलांचे शिक्षण दिले जायचे. अहंभाव वाढण्याआधीच मुलांना अध्यात्माचे शिक्षण दिल्यास त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होऊन आध्यात्मिक उन्नती होते.

शिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही !

सध्या लोक किंवा शासन जे काही निर्णय घेते, ते केवळ बुद्धीचा किंवा विज्ञानाचा उपयोग करूनच घेते. त्यामुळे ते बहुतांशी चुकीचे असतात. हे पुढील दोन उदाहरणांवरून पाहूया.